शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

मुलगी बघायला निघालेलं कुटुंब, भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 14:20 IST

जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे समजते. 

जौनपूर - उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथे कार आणि ट्रकच्या भीषण अपघाताची घटना घडली. येथील प्रसाद इंजिनिअरींग महाविद्यालयाजवळ झालेल्या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहित मिळताच स्थानिक पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच, अपघातातील मृतांचे शव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तर, जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे समजते. 

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील कुटुंब एर्टींगा कारमधून प्रयागराजला जात होते. जौनपूरच्या गौरदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसाद इंस्टीट्यूटजवळ कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये, एर्टींगा कारमधील एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.

दरम्यान, कारमधील कुटुंब मुलासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असल्याने प्रयागराजला निघाले होते. मात्र, वाटेतच ही भीषण दुर्घटना घडली. त्यामध्ये, अनिश गजाधर शर्मा, गजाधर लक्ष्मण शर्मा, जवाहर रामप्रताप शर्मा, गौतम जवाहर शर्मा, सोनम बजरंग शर्मा, रिंकू पवन शर्मा यांचा मृत्यू झाला.  

याबाबत माहिती देताना केराकतच्या मुख्याधिकारी यांनी सांगितले की, अपघातग्रस्त कार आणि ट्रक ताब्यात घेण्यात आला असून अपघाताची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. ट्रक चालक आणि इतर दोघे फरार झाले आहेत. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र, पोलिसांकडून ट्रक चालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.  

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश