शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 23:06 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अत्याधुनिक कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी (२९ ऑगस्ट) अवध विहार योजनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या अत्याधुनिक कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन केले. यावेळी बोलताना त्यांनी 'उत्तर प्रदेशमुळेच भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे', असे महत्त्वपूर्ण विधान केले. ५० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चातून उभारली जाणारी ही इमारत लोकशाही प्रक्रिया अधिक मजबूत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर, राज्य निवडणूक आयुक्त राजन प्रताप सिंह, यूपी महिला आयोगाच्या अध्यक्षा, एससी-एसटी आयोगाच्या अध्यक्षा, पंचायती राज्य आयोगाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

जनताच आमच्यासाठी 'जनार्दन'!मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "जनता ही केवळ मतदार नसून आमच्यासाठी 'जनार्दन' अर्थात ईश्वर आहे." ते म्हणाले की, जर कोणताही लोकप्रतिनिधी जनतेच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करत असेल, तर जनता पाच वर्षांनंतर त्याला नाकारते. हीच लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे आणि या व्यवस्थेनेच भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले आहे.

उत्तर प्रदेशमधील निवडणूक प्रक्रिया जगात सर्वात मोठी!मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रक्रियेची विशालता अधोरेखित केली. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात केवळ त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेत १२ कोटींहून अधिक मतदार मतदान करतात, जी जगातील अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. राज्यात ५७,६०० ग्रामपंचायती, ८२६ क्षेत्र पंचायती आणि ७५ जिल्हा पंचायती आहेत. याशिवाय, १७ महानगरपालिका, १९९ नगरपालिका आणि ५४४ नगरपंचायतींसह १४,००० हून अधिक नगरसेवकांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे.

आतापर्यंत निवडणूक आयोगाचे कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते, परंतु आता अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्वतःची इमारत मिळाल्याने आयोगाच्या कामकाजाला गती मिळेल, असे योगी म्हणाले. सुमारे २,६१८ चौरस मीटर जागेवर सहा मजली इमारत १८ महिन्यांत पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले.

२०४७ पर्यंत 'विकसित भारत'चे स्वप्न!मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'विकसित भारत २०४७'च्या ध्येयावरही भर दिला. ते म्हणाले, "विकसित उत्तर प्रदेशशिवाय 'विकसित भारत'चे स्वप्न अपूर्ण राहील. या दिशेने, निवडणूक आयोगासारख्या लोकशाही संस्था मजबूत असणे ही सर्वात मोठी हमी आहे", असे त्यांनी सांगितले.

नवीन इमारतीतील अत्याधुनिक सुविधाया नवीन इमारतीमध्ये रोड पाथवे, ओपन पार्किंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सीवेज ट्रीटमेंट प्लांट (STP) यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रणाली, दोन १३-व्यक्ती क्षमतेच्या लिफ्ट आणि एक ८-व्यक्ती क्षमतेची लिफ्ट, तसेच आधुनिक विद्युतीकरण व्यवस्थाही असणार आहे. हे कार्यालय एक आदर्श कार्यालय म्हणून उदयास येईल, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूक 2024