शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 19:37 IST

Yogi Adityanath : जर एखादी व्यक्ती किंवा संस्था सातत्याने अधोगतीकडे जात असेल तर ती विकृती आहे. याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतला आणि तो निर्णय व्यापक जनहित आणि राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती आहे. याच संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, डॉ. राम मनोहर लोहिया आयुर्विज्ञान संस्थान.

लखनऊ: आपल्या जीवनात तीन अवस्था असतात, पहिली प्रवृत्ती, दुसरी विकृती आणि तिसरी संस्कृती. यांपैकी परिस्थिती आहे तसे राहणे ही प्रवृत्ती आहे. माणसाला बदल हवा असतो, मात्र, तो स्वतःमध्ये बदल करण्यासाठी कचरतो. जर एखादी व्यक्ती किंवा संस्था सातत्याने अधोगतीकडे जात असेल तर ती विकृती आहे. याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतला आणि तो निर्णय व्यापक जनहित आणि राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती आहे. याच संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, डॉ. राम मनोहर लोहिया आयुर्विज्ञान संस्थान. या संस्थेने अवघ्या 19 वर्षांत 20 खाटांपासून 1,375 खाटांपर्यंत विस्तार केला आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते शनिवारी इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे आयोजित डॉ. राम मनोहर लोहिया आयुर्विज्ञान संस्थानच्या स्थापना दिना निमित्त आयोजित समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी 298 कोटींच्या प्रकल्पांचेह लोकार्पण आणि शिलान्यास केला.

काळाच्या गतीपेक्षा दोन पावले पुढे राहण्यासाठी तयार रहा - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, देश आणि व्यक्तीची गती ही काळाची गती आहे. आपण काळाच्या गतीपेक्षा दोन पावले पुढे राहण्यासाठी तयार असले पाहिजे. जो व्यक्ती, समाज किंवा देश काळाची गती ओळखू शकत नाही, तो काळाच्या तडाख्यात येतो. कारण काळाची गती तीच आहे, ज्याबद्दल डॉ. श्याम नारायण पांडेय म्हणाले होते की, हे महाकालाचा आसन आहे, यावर कुणाचेही शासन चालत नाही. 

योगी पुढे म्हणाले, जर कुणाला वाटत असेल की, मी काळाची गती रोखू शकतो, तर हा त्याचा गैरसमज आहे. यामुळे आपल्याला काळाच्या गतीपेक्षाही दोन पावले पुढे चालावे लागेल. जर आपण या गतीने चाललो, तर प्रगती करू; जर चालू शकत नसू, आपण केवळ काळानुसारच स्वत:ला ढाळत असू, तर लोक आपल्याला यथास्थितिवादी म्हणून ओळखतील. आपण कधी आलो, कधी गेलो, हे कुणाला समजणारही नाही. आणि आपल्यामुळे संस्थेचे नुकसान होत असेल, तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. 

काळाच्या गतीच्या बाबतीत या संस्थेने चांगली प्रगती केली आहे. यामुळेच संस्थेने अवघ्या पाच वर्षांत राज्यातील टॉप तीन वैद्यकीय संस्थांमध्ये आपले नाव कोरले आहे. यांपैकी पहिली केजीएमयू 110 वर्षे पूर्ण केली आहेत, दुसरी एसजीपीजीआय जवळपास चार दशके जुनी आहे, तर लोहिया संस्थानाने कमी कालावधीत मोठी भरारी घेतली आहे आणि राज्यातील टॉपचे तिसऱ्या क्रमांकाचे वैद्यकीय संस्थान बनले आहे. ही यशस्विता दर्शवते की आपली दिशा आणि नेतृत्व योग्य आहे. आपण योग्य दिशेने जात आहोत. यात अनेक भौतिक आव्हाने येतात, पण जर टीमवर्क असेल, काम करण्याचा उत्साह असेल, तर तो लोकांच्या मनात नवीन उत्साह निर्माण होतो.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा