शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

२०४७ पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी; ३५ हजार कोटी खर्चून होतोय मेकओव्हर

By यदू जोशी | Updated: December 30, 2023 05:14 IST

प्रचंड प्रमाणात विकासकामे सुरू

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या : अयोध्यानगरी आणि आसपासच्या परिसरात सध्या प्रचंड पायाभूत सुविधांची उभारणी केली जात असून, जगभरातील पर्यटक यापुढे लाखोंच्या संख्येने नित्यनेमाने येत राहणार हे लक्षात घेऊन ३५ हजार कोटी रुपये खर्चाचा मेकओव्हर प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी योगी सरकारने सुरू केली आहे. या शिवाय, सन २०४७ पर्यंत अयोध्येला जागतिक आध्यात्मिक राजधानी बनविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. 

भव्यदिव्य राम मंदिराचे कोट्यवधी हिंदूंचे स्वप्न साकारत असतानाच दुसरीकडे त्या निमित्ताने उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त बळकटी देईल, असा विकासाचा ‘अयोध्या ब्रॅण्ड’ही आकार घेत असल्याचे दिसत आहे. आयएएस अधिकारी असलेले प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विशाल सिंग यांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती दिली. 

श्री राम यांचे शेवटचे स्नान गुप्तार घाटावर

गुप्तार घाट ही एक अनोखी जागा आहे. शरयू नदीच्या तिरावरील या घाटावर प्रभू श्री राम यांनी वैकुंठ गमनापूर्वीची शेवटचे स्नान केले होते. त्यामुळे हा घाट अतिशय पवित्र मानला जातो. तेथे मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या जात आहेत. राम पथ, भक्ती पथ आणि राम जन्मभूमी मार्गासह ३० किलोमीटर लांबीच्या दर्शनी भागात सुधारणा करण्यात येत आहेत. सर्व घरे, दुकानांचा सारखाच रंग, त्यावर राम मंदिराची कमान, प्रभू रामाची विविध रुपे असलेली चित्रे साकारण्यात येत आहे. 

नेमकी कशी बदलतेय अयोध्यानगरी?

अयोध्या नगरीत २५ ठिकाणी ९ मीटर उंचीचे श्री राम स्तंभ उभारण्यात येणार आहेत. ‘राम की पैडी’ म्हणजे शरयू नदीवरील घाटांची मालिका. प्रभू श्री राम शरयू नदीवर स्नानासाठी या मार्गानेच जात असे मानले जाते. या ठिकाणी लता मंगेशकर स्मृती चौक उभारला आहे. लतादीदींनी गायलेली प्रभू रामाची महती सांगणारी भजने येथे ऐकायला मिळतात. शरयू नदीच्या मध्यात पंचवटी द्विपाची उभारणी केली जात आहे. तिथे विविध प्रकारच्या धार्मिक, मनोरंजनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. शरयूच्या तिरावर पॅराग्लायडिंग, जेट-स्की, हॉट एअर बलून असे साहसी खेळ असतील. ३२ हेक्टर परिसरात ग्रीन फिल्ड वेदिक सिटीची उभारणी केली जाणार आहे. देशविदेशातील उच्चभ्रू लोकांसाठी वेगळा झोन असेल. चौधरी चरणसिंग घाटालगत त्यासाठी अयोध्या हाट उभारले जात आहे. तिथे निसर्गरम्य वातावरणातील महागडी निवासस्थाने, अलिशान हॉटेल्स आणि करमणुकीसाठीची साधने असतील.

अयोध्येची नकोशी ओळख अशी पुसली जाणार...

धर्माला अध्यात्माची जोड देत अयोध्या जागतिक केंद्र व्हावे आणि भारतीय जीवनशैली, तत्त्वज्ञान व धार्मिकतेचा संगम साधत त्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठीच्या आवश्यक सोयीसुविधांची उभारणी अयोध्येत केली जात आहे. दर्शननगर भागातील सूर्यकुंड हे सूर्यवंशी शासकांनी सूर्याची आराधना करण्यासाठी बांधले होते. सूर्यकुंडाचा परिसर आता सुसज्ज करण्यात येत आहे. साउंड ॲण्ड लाइट शोद्वारे सूर्यकुंडाचा इतिहास विदित केला जाईल. आजूबाजूला भरपूर पार्किंग व्यवस्था, फूडकोर्ट, ओपन जिम, स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येत आहे. अशा नागरी सुविधा संपूर्ण शहर व परिसरातही उभारल्या जात आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलांची उभारणी जागोजागी होत आहे. त्यामुळे अरुंद गल्लीबोळांचे आणि अत्यंत गैरसोयींचे शहर ही अयोध्येची नकोशी ओळख पुसली जाणार आहे. 

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर