शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नवरदेवाशिवाय शेकडो वधूंनी स्वत:च्याच गळ्यात घातल्या वरमाला! उत्तर प्रदेशमध्ये मोठा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 06:36 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत मोठा घोटाळा समोर आला आहे. या ठिकाणी २५ जानेवारी रोजी ५६८ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले होते. मात्र यापैकी अनेक विवाह हे नवरदेवाशिवाय लावण्यात आले.

बलिया - उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत मोठा घोटाळा समोर आला आहे. या ठिकाणी २५ जानेवारी रोजी ५६८ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले होते. मात्र यापैकी अनेक विवाह हे नवरदेवाशिवाय लावण्यात आले. कहर म्हणजे शेकडो वधूंनी स्वत:च्याच गळ्यात वरमाला घातल्या. तर अनेकांचे लग्न यापूर्वी झाले असताना त्याही यात लग्नासाठी उभ्या राहिल्या. आता या प्रकरणामध्ये अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेक तरुणी येथे फिरण्यासाठी आल्या होत्या. लग्नासाठी उभ्या राहा, तुम्हाला भरपूर पैसे देऊ असे आमिष दाखवून या मुलींना सोहळ्यात सहभागी करून घेण्यात आले. सोशल मीडियावर या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

कुणाचे कधी झाले होते लग्न?मंगळवारी रात्री जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक श्रीवास्तव यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सहायक विकास अधिकारी सुनील कुमार यादव आणि आठ लाभार्थी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना यांचे जून २०२३ मध्ये, रंजना यादव आणि सुमन चौहान यांचे मार्च २०२३ मध्ये, प्रियांकाचे लग्न नोव्हेंबर २०२३ मध्ये झाले होते, पूजाचे लग्न एक वर्षापूर्वी झाले, संजूचे तीन वर्षांपूर्वी, रमिताचे जुलै २०२३ मध्ये लग्न झाले होते.

आम्ही विवाह बघायला गेलो होतो अन्...-आम्ही सामूहिक विवाह बघायला गेलो होतो. त्यांनी आम्हाला दोन-तीन हजार रुपयांचे आमिष दाखवून तेथे वर म्हणून बसवले. -आम्ही स्वतः आमच्या गळ्यात हार घालून आमचा फोटो काढला, असे या घोटाळ्यातील एका तरुणाने म्हटले आहे.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नCorruptionभ्रष्टाचार