शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

"ज्यांचे कुटुंब नाही ते...", दहावीतील विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांची योगींवर बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 18:35 IST

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील विद्यार्थ्याच्या हत्येवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील विद्यार्थ्याच्या हत्येवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले. येथील एका साडी व्यावसायिकाच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांनी योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अखिलेश यादव म्हणाले की, ज्यांचे कुटुंब नाही ते इतरांच्या कुटुंबातील सदस्यांचे दुःख समजू शकत नाहीत. ज्या कुटुंबाने तरूण मुलगा गमावला त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल? पोलिसांकडून राजकीय काम करून घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्था कशी सुधारेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  दरम्यान, कानपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्याच्या कुटुंबीयांकडून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रश्नावर अखिलेश यादव म्हणाले की, जर तुम्ही पोलिसांकडून राजकीय काम करून घेतले तर कायदा आणि सुव्यवस्था चांगली होईल, अशी अपेक्षा का करता? मुलाचे अपहरण होऊन त्याचा जीव गेला. त्या कुटुंबावर काय आघात झाला असेल याची कल्पना करा. 

अखिलेश यादवांची बोचरी टीका तसेच ज्या कुटुंबाने आपला मुलगा गमावला आहे त्यांचे काय झाले असेल? उत्तर प्रदेशमधील ही पहिली घटना नाही. अलाहाबाद आणि चित्रकूटमध्येही हे घडले आहे. म्हणूनच मी पीडित कुटुंबीयांना सांगतो की, ज्यांचे कुटुंब नाही ते तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे दुःख समजू शकत नाहीत, असा टोला अखिलेश यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीyogi adityanathयोगी आदित्यनाथ