शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"ज्यांचे कुटुंब नाही ते...", दहावीतील विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांची योगींवर बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 18:35 IST

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील विद्यार्थ्याच्या हत्येवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील विद्यार्थ्याच्या हत्येवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले. येथील एका साडी व्यावसायिकाच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांनी योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अखिलेश यादव म्हणाले की, ज्यांचे कुटुंब नाही ते इतरांच्या कुटुंबातील सदस्यांचे दुःख समजू शकत नाहीत. ज्या कुटुंबाने तरूण मुलगा गमावला त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल? पोलिसांकडून राजकीय काम करून घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्था कशी सुधारेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  दरम्यान, कानपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्याच्या कुटुंबीयांकडून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रश्नावर अखिलेश यादव म्हणाले की, जर तुम्ही पोलिसांकडून राजकीय काम करून घेतले तर कायदा आणि सुव्यवस्था चांगली होईल, अशी अपेक्षा का करता? मुलाचे अपहरण होऊन त्याचा जीव गेला. त्या कुटुंबावर काय आघात झाला असेल याची कल्पना करा. 

अखिलेश यादवांची बोचरी टीका तसेच ज्या कुटुंबाने आपला मुलगा गमावला आहे त्यांचे काय झाले असेल? उत्तर प्रदेशमधील ही पहिली घटना नाही. अलाहाबाद आणि चित्रकूटमध्येही हे घडले आहे. म्हणूनच मी पीडित कुटुंबीयांना सांगतो की, ज्यांचे कुटुंब नाही ते तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे दुःख समजू शकत नाहीत, असा टोला अखिलेश यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीyogi adityanathयोगी आदित्यनाथ