शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"ज्यांचे कुटुंब नाही ते...", दहावीतील विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांची योगींवर बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 18:35 IST

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील विद्यार्थ्याच्या हत्येवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील विद्यार्थ्याच्या हत्येवरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले. येथील एका साडी व्यावसायिकाच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येवरून अखिलेश यांनी योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अखिलेश यादव म्हणाले की, ज्यांचे कुटुंब नाही ते इतरांच्या कुटुंबातील सदस्यांचे दुःख समजू शकत नाहीत. ज्या कुटुंबाने तरूण मुलगा गमावला त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल? पोलिसांकडून राजकीय काम करून घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्था कशी सुधारेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  दरम्यान, कानपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्याच्या कुटुंबीयांकडून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रश्नावर अखिलेश यादव म्हणाले की, जर तुम्ही पोलिसांकडून राजकीय काम करून घेतले तर कायदा आणि सुव्यवस्था चांगली होईल, अशी अपेक्षा का करता? मुलाचे अपहरण होऊन त्याचा जीव गेला. त्या कुटुंबावर काय आघात झाला असेल याची कल्पना करा. 

अखिलेश यादवांची बोचरी टीका तसेच ज्या कुटुंबाने आपला मुलगा गमावला आहे त्यांचे काय झाले असेल? उत्तर प्रदेशमधील ही पहिली घटना नाही. अलाहाबाद आणि चित्रकूटमध्येही हे घडले आहे. म्हणूनच मी पीडित कुटुंबीयांना सांगतो की, ज्यांचे कुटुंब नाही ते तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे दुःख समजू शकत नाहीत, असा टोला अखिलेश यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीyogi adityanathयोगी आदित्यनाथ