शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

आजोबा सरपंच असताना गावात बांधलं शौचालय; भींत कोसळून दोन नातींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 09:56 IST

विशेष म्हणजे हे सार्वजनिक शौचालय, या मुलींचे आजोबा गावचे सरपंच असतानाच बांधण्यात आले होते. 

लखनौ - उत्तर प्रदेशच्या बालिया येथे एका सार्वजनिक शौचालयाची भींत पडल्याने अपघात होऊन दोन मुलींचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. मृत दोन्ही मुली अल्पवयीन असून सख्या बहिणी होत्या. याप्रकरणी, पोलिसांनी प्राथमिक तपास करुन माहिती दिली. सार्वजनिक शौचालयाजवळ खेळत असताना अचाकन भीतं त्यांच्या अंगावर कोसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने या दोन्ही बालिकांचा जीव गमावला. विशेष म्हणजे हे सार्वजनिक शौचालय, या मुलींचे आजोबा गावचे सरपंच असतानाच बांधण्यात आले होते. 

अधिक माहिती देत पोलीस निरीक्षक धर्मवीर सिंह यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी अंशू आणि तनू या दोन्ही सख्ख्या बहिणी गावातील सार्वजनिक शौचालयाजवळ खेळत होत्या. त्याचवेळी, या शौचालयाची भींत कोसळल्याने, भींतींच्या ढिगाऱ्याखाली त्या दबल्या गेल्या. त्यानंतर, नातेवाईकांनी तत्काळ त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

दरम्यान, २००२ साली जेव्हा गावातील हे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते. त्यावेळी, मृत लहान मुलींचे आजोबा राजनाथ यादव हेच गावचे प्रमुख म्हणजेच सरपंच होते. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.  

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतAccidentअपघातPoliceपोलिस