शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

२.५ कोटींची जमीन, अन् गेले सहा जीव; उत्तर प्रदेशात घडले भीषण हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 06:00 IST

या घटनेवर शोक व्यक्त करीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडू नका, अशा कडक सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

राजेंद्र कुमार

देवरिया :उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात अडीच कोटी रुपयांच्या जमिनीवरून दोन गटात झालेल्या वादात एकाच कुटुंबातील पाच आणि अन्य एक अशा सहा जणांची हत्या झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेवर शोक व्यक्त करीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडू नका, अशा कडक सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

पोलिस अधीक्षक (एसपी) संकल्प शर्मा यांनी सांगितले की, सत्य प्रकाश दुबे (वय ५४), त्यांची पत्नी किरण (५२), मुलगी सलोनी (१८), नंदिनी (१०) व मुलगा गांधी (१५) यांची आज सकाळी ६ वाजता रुद्रपूर पोलिस स्टेशन हद्दीतील फतेहपूर गावात हत्या करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेम यादव (५०) यांना सत्य प्रकाश दुबे यांच्या गटातील लोकांनी बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेत सत्य प्रकाश दुबे यांचा मुलगा अनमोल हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नेमके काय घडले?

सत्य प्रकाश दुबे यांचा भाऊ साधू दुबे यांनी त्यांची जमीन प्रेम यादव यांना विकली. 

यादव हे जमिनीवरील पिकाची कापणी करण्यास गेले, तेव्हा सत्य प्रकाश यांनी विरोध केला.

त्यातून झालेल्या वादात यादव समर्थकांनी सत्यप्रकाश यांच्या घरात घुसून हत्याकांड घडवले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी