शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कलात्मक, ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? नागोरचा किल्ला ठरेल उत्तम पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 12:07 IST

तुम्ही एखाद्या कलात्मक, ऐतिहासिक आणि पारंपारिक ट्रिपचा प्लॅन करत असाल तर तुम्ही या सर्व गोष्टींचा अनुभव नागोरमध्ये घेऊ शकता.

तुम्ही एखाद्या कलात्मक, ऐतिहासिक आणि पारंपारिक ट्रिपचा प्लॅन करत असाल तर तुम्ही या सर्व गोष्टींचा अनुभव नागोरमध्ये घेऊ शकता. येथील किल्ल्याला भेट देऊन तुम्ही एका अविस्मरणीय ट्रिपचा आनंद घेऊ शकता. जोधपुरपासून जवळपास १३७ किमी अंतरावर नागोर आहे. नागोरमध्ये शिरताच येथील सौंदर्य तुम्हाला आकर्षित करेल. येथील सुंदरता इतकी लोकप्रिय आहे की, वर्षभर इथे भारतीयांसोबतच परदेशी पर्यटकांचीही गर्दी असते. 

नागोर किल्ला

राजस्थानच्या इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला सुद्धा डोंगराच्या माथ्यावर तयार करण्यात आलाय. या किल्ल्याला नागणा दुर्ग, नाग दुर्ग आणि अहिछत्रपूर दुर्ग या नावांनीही ओळखले जाते. हा किल्ला त्याच्या सुंदर आणि अद्भूत बनावटीसाठी लोकप्रिय आहे. मातीपासून तयार या किल्ल्याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. असे म्हटले जाते की, अर्जुनाने हा किल्ला जिंकला होता आणि गुरू द्रोणाचार्यांचा भेट दिला होता. 

किल्ल्याची शानदार बनावट

किल्ल्याच्या आत अनेक छोटे छोटे सुंदर महालं आहेत. हाडी राणी, शीश महाल आणि बादल हे तीन महाल त्यांच्या सुंदर बनावटीसाठी जगभराल प्रसिद्ध आहेत. किल्ल्याच्या आत राजपूत शैलीमध्ये तयार करण्यात आलेल्या सैनिकांच्या छत्र्या बघायला मिळतात. सपाट जमिनीवर तयार करण्यात आलेल्या या किल्ल्याच्या भींती उंच आहेत आणि परिसरही मोठा आहे. या किल्ल्याला एकूण ६ मोठे दरवाजे आहेत. पहिला दरवाजा लोखंड आणि लाकडाच्या टोकदार खिळ्यांनी मिळून तयार केला आहे. 

किल्ल्याची खासियत

नागोरच्या या किल्ल्याची खासियत म्हणजे या किल्ल्याच्या भींतींवर तोफगोळ्यांचा काहीही प्रभाव पडत नाही. 

आणखीही ठिकाणे

नागोर आणि आजूबाजूला फिरण्यासाठी नागोरचा किल्ला, तारकिन दरगाह, मीराबाई यांचं जन्मस्थळ मेडता, कुचामन किल्ला, वीर अमर सिंह राठोड यांची छत्री आणि खिंवसर किल्ला आहे.

कधी जाल?

वर्षभरात तुम्ही कधीही नागोरला जाण्याचा प्लॅन करू शकता. पण महाल फिरण्यासोबतच येथील बहारदार वातावरणाचाही आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही फेब्रवारी ते मे आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान इथे भेट द्या. 

कसे जाल?

हवाई मार्ग - जोधपूर हे इथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळील एअरपोर्ट आहे. दिल्ली, जयपूर आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधून तुम्ही फ्लाइट बुक करू शकता. 

रेल्वे मार्ग - दिल्ली, बीकानेर, जयपूर, जोधपूर या शहरातून रेल्वे सुविधा आहे. 

रस्ते मार्गे - नागोर बीकानेर, जोधपूर, जयपूर आणि अजमेर या सर्वच मोठ्या शहरांसोबत रस्ते मार्गाने जोडलं गेलं आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सRajasthanराजस्थानtourismपर्यटन