शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

व्हॅलेनटाईन डे ला पार्टनरला बाहेर घेऊन जायचंय? वन डे रिटर्न ट्रिपसाठी 'ही' ठिकाणं आहेत बेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:10 IST

व्हॅलेंटाईन वीक सरू व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत.

व्हॅलेंटाईन वीक सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. जर तुम्हाला आपल्या पार्टनरसोबत व्हॅलेनटाईन डे एन्जॉय करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.  ज्या ठिकाणी तुम्ही एका दिवसात सुद्धा जाऊन येऊ शकता. कारण व्हॅलेनटाईन डे साठी आपल्याला कधीच सुट्टी वैगेरे मिळत नसते. तरी सुद्धा तो दिवस आपण पार्टनरसोबत घालवावा असं आपल्याला वाटत असतं. काही ठिकाणं अशी आहेत जी मुंबईपासून काही अंतरावर  आहेत. या ठिकाणी तुम्ही पार्टनरसोबत व्हॅलेनटाईन डे साजरा करून आपल्या घरी सुद्धा लवकर पोहोचू शकता. चला तर मग जाणून घ्या कोणती आहेत ती ठिकाणं.

लोणावळा

(image credit- trip advisor)

भारतीयांबरोबरच परदेशी नागरिकांना भुरळ लोणावळ्याने घातली आहे. मुंबईपासून ४ तासांच्या अंतरावर  हे पर्यटनस्थळ आहे. येथील धबधबे, धरणं, किल्ले नेहमीच पर्यटकांना आकर्षिक करत असतात. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत या ठिकाणी गेलात तर लॉन्ग ड्राईव्ह किंवा बाईक राईडचा आनंद तुम्हाला घेता येईल.

माथेरान

निसर्ग सौंदर्याने नटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे- मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’. हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे.पॅनोरमा, गार्बेट, अलेक्सझांडर, हार्ट, लिटल चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पाक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, आदी पॉईंटस् पाहण्यासारखे आहेत.इथल्या निसर्गसौंदर्याला अजूनतरी प्रदुषणाचे गालबोट लागलेले नाही. 

या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही आधी ट्रेनने नेरळला जा. त्यानंतर तुम्हाला खासगी वाहनं अमनलॉज स्टेशनपर्यंत  सोडतील. त्यानंतर घोडे किंवा पायी चालत तुम्ही माथेरानचे सौंदर्य पाहू शकता. जर तुम्हाला घरी लवकर जायचं असेल तर संपूर्ण दिवस तुम्ही भटकंती करून आपल्या घरी परतू शकता. ( हे पण वाचा-एन्जॉय करण्यासाठी कोकणातली 'ही' पर्यटन स्थळं आहेत बेस्ट, कमी खर्चात जास्त मजा)

अलिबाग

मुंबईच्या जवळील एक सुंदर पर्यटनस्थळ अशी अलिबागची ओळख आहे. पण, अलिबाग हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं ठिकाणही आहे. तुम्ही बोट किंवा बाईक, कारने या ठिकाणी जाऊ शकता. पार्टनरला सरप्राईज देऊ शकता. अलिबागला मुंबईवरून जाण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. शिवाय बोटीने जर तुम्ही  जात असाल तर गेट वे ऑफ इंडियाला जावं लागेल. त्यानंतर तुम्ही बोटीने हा प्रवास कमीत कमी खर्चात करू शकता. जर तुम्हाला बाईक किंवा बसने या ठिकाणी जायचं असेल तर पनवेल मार्गे जाऊ शकता. ( हे पण वाचा- भारतातील 'या' ठिकाणांवर जायला भारतीयांनाच नो एन्ट्री....)

माळशेज घाट 

(image credit- holidity)

माळशेज घाट हा पश्चिम घाटांमधील एक डोंगरी खिंड आहे. माळशेज घाटामध्ये अनेक धबधबे आहेत आणि विशेषतः पावसाळ्यात इथली हिरवाई अप्रतिम दिसते. मुंबईपासून १५४ किमी आणि पुण्यापासून १३० किमीवर हे ठिकाण आहे. माळशेज घाट हे हायकर्स, ट्रेकर्ससाठी हे उत्तम ठिकाणं आहे.  गर्दीच्या ठिकाणापासून दूर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स