शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अखेर द्रोणागिरीवरील (मृत) संजीवनीचा शोध संपला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 17:50 IST

रामायणात लक्ष्मणावर ज्या दिव्य वनौषधीचा उपचार करून त्याचे प्राण वाचवले, ती वनौषधी म्हणजे द्रोणागिरी पर्वतावरील ‘संजीवनी’. डॉ. आर. बी. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली 15 हजार फूट उंचीवरच्या लेह इथल्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रयोगशाळेतील संशोधक वैज्ञानिकांच्या चमूला संजीवनी वनस्पतीच्या शोधाला अखेर यश मिळालं.

डॉ. उदयकुमार पाध्ये

रामायणात लक्ष्मणावर ज्या दिव्य वनौषधीचा उपचार करून त्याचे प्राण वाचवले, ती वनौषधी म्हणजे द्रोणागिरी पर्वतावरील ‘संजीवनी’. डॉ. आर. बी. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली 15 हजार फूट उंचीवरच्या लेह इथल्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रयोगशाळेतील संशोधक वैज्ञानिकांच्या चमूला संजीवनी वनस्पतीच्या शोधाला अखेर यश मिळालं. या दिव्य मृतसंजीवनीने आतापर्यंत अनेक अभ्यासकांना चकवा आणि आधुनिक औषधविज्ञानाला आव्हान दिलेलं होतं. आजही या वनौषधीच्या शोधात द्रोणागिरीवर अनेक संशोधक भटकत आहेत.

जिथे केवळ पोहोचणे हे दिव्य असते. जिवंत राहणे हा चमत्कार असतो व सशस्त्र गस्त घालणे, ही एक अशक्यप्राय खरीखुरी परीक्षाच घेणाऱ्या सियाचीन ग्लेशियरच्या भागात तैनात जवानांना जीवदान देणारी, बलकारक, गोठवणाऱ्या तापमानात प्राणवायूची कमतरता असूनही स्फूर्ती देणारी, रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी, बदलत्या वातावरणातही तग धरण्यास साहाय्य करणारी व विशेष म्हणजे जैवरासायनिक युद्धात होणाऱ्या गॅमा किरणोत्सारापासून संरक्षण देणाऱ्या अशा एका अद्भुत वनस्पतीच्या शोधाला अखेर यश मिळालं होतं. पंधरा हजार फूट उंचीवरच्या लेह इथल्या संरक्षण मंत्रालयाच्या (ऊकऌअफ) प्रयोगशाळेतील संशोधक वैज्ञानिकांचा चमू आश्वस्त झाला होता.

डॉ. आर.बी. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणांमध्ये नोंदी प्रमाणित करण्याची व वारंवार त्या पाहण्याची लगबग काहीशी थांबली होती. चंबू, चंचूपात्र व परीक्षानळ्यांचा खणखणाटही स्थिरावला होता. प्राण्यांवर केले जाणारे वनौषधीचे प्रयोग विसावले होते. कारण, त्या वाल्मीकी रामायणाच्या जीर्णशीर्ण पोथीत उल्लेखलेली, मूर्च्छित लक्ष्मणाला जीवदान देणारी, बहुचर्चित, रहस्यमय, अनेक अभ्यासकांना अजूनपर्यंत चकवा देणारी व आधुनिक औषधविज्ञानाला आव्हान देणारी दिव्य मृतसंजीवनी अखेर हाती लागली होती. गढवाल-कुमाडच्या गिरीशिखरातील बर्फाळ कडेकपारीत पारंपरिक वैदूंच्या मदतीने केलेल्या अथक शोधकार्याला फळ लागलं होतं. पवनसुतानं मिळवलेल्या अष्टसिद्धींच्या जोरावर प्राप्त केलेली व त्याच्या रघुवंशप्रेमाचं द्योतक असलेली संजीवक बुटी बहुधा शोधली गेली होती.

रामायण लंकाकांडातील संदर्भानुसार श्रीराम, सीतेच्या सुटकेसाठी रावणाशी युद्ध करत होता. तेव्हा वानरसेना रावणाच्या हल्ल्याने हतबल झाली. ज्यावेळी शेषावतार लक्ष्मणाने पाहिले की, रावणपुत्र हा अधर्म व कपटाने लढत आहे, त्यावेळी चिडून त्याने मेघनादाचा रथ त्वरित मोडून टाकला व त्याच्या सारथ्याचे तुकडेतुकडे केले. मेघनादाला अंदाज आला की, आता प्राणसंकट ओढवले आहे व हा लक्ष्मण माझे प्राणच घेईल. दुष्ट मेघनादाने अत्यंत किरणोत्सारी असं वीरघातिनी हे तेजपूर्ण शक्ती अस्त्र लक्ष्मणावर सोडलं, जे त्याच्या छातीला लागले व त्यामुळे लक्ष्मणाला मूर्च्छा आली. त्याच्यावर उपचारासाठी श्रीलंकेतील सुप्रसिद्ध सिद्ध राजवैद्य, जो सुग्रीवाचा सासरा होता, तो सुषेण याला पाचारण करण्यासाठी हनुमान शरीराचा आकार लहान करून गेला. त्याने युद्धभूमीवरील मूर्च्छित लक्ष्मणाचे निदान करून कैलास व वृषभ पर्वतांवरील पहाडी भागात जाऊन प्राणरक्षक संजीवनी तत्काळ आणण्यास सांगितले.सिद्ध वैद्य सुषेणच्या आज्ञेनुसार हनुमानाने आताच्या उत्तराखंड राज्यातील गढवाल प्रभागात असलेल्या द्रोणागिरी पर्वतावर जाऊन संजीवनीचा शोध घेतला. त्यासाठी त्याने स्थानिकांची मदत घेतली. मात्र, त्यानंतरही वनस्पतीची खात्रीशीर ओळख न पटल्यामुळे अधिक वेळ न दवडता त्याने औषधी पहाडाचा तो वनौषधी असलेला भागच उचलून आणला. सुषेण याने ताबडतोब त्या वनस्पतीचं औषधी मिश्रण लक्ष्मणाला पाजले व या दिव्य संजीवनी वनस्पतीच्या सिद्धकल्पामुळे लक्ष्मणाचे प्राण वाचले होते. द्रोणागिरीचा तो भाग हनुमानाने जैवविविधतेच्या रक्षणासाठी पुन्हा तेथे नेऊन ठेवला, असं बरेच जण मानतात, म्हणून अधिकाधिक संशोधक हे द्रोणागिरीवर अजूनही भटकताहेत. स्थानिकांकडून शेती करून किंवा जंगलातून काही जर्मन लोक परस्पर वनस्पती घेऊन जाताहेत. (पूर्वार्ध)

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन