शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

देशातील ते ठिकाण जिथे सर्वातआधी उगवतो सूर्य, सकाळी ३ वाजताच रंगतो किरणांचा खेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 11:34 IST

आजच्या बिझी लाइफमध्ये लोक सकाळी इतक्या घाईत असतात की, ते सूर्याला उगताना पाहूच शकत नाही. कामाचा इतका थकवा त्यांना आलेला असतो की, ते सूर्योदय होत असताना जागंही होता येत नाही.

अमेरिकन लेखक आणि पत्रकार जेनेट वॉल्सने आपल्या एका पुस्तकात लिहिले आहे की, तुम्हाला जर देवाला जवळून अनुभवायचं असेल तर तुम्ही सूर्योदय होतांना पहायला हवं. आजच्या बिझी लाइफमध्ये लोक सकाळी इतक्या घाईत असतात की, ते सूर्याला उगताना पाहूच शकत नाही. कामाचा इतका थकवा त्यांना आलेला असतो की, ते सूर्योदय होत असताना जागंही होता येत नाही. लाल आणि पिवळ्या आकाशासोबत जेव्हा सूर्याची चमकदार किरणे जमिनीवर पडतात तेव्हा स्वर्गाचा अनुभव येतो. 

आपल्या बिझी शेड्यूलमधून तुम्हीही कधीना कधी सूर्योदय नक्की पाहिला असेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, देशातील कोणत्या भागात सर्वातआधी सूर्योदय होतो. आश्चर्याची बाब ही आहे की, जेव्हा तुम्ही तुमच्या बिछान्यावर झोपले असता आणि खिडकी बाहेर आकाश काळं असतं. तेव्हा कोण्या एका कोपऱ्यात सुर्याची किरणे पसरायला सुरुवात होते. असे केवळ दुसऱ्या देशात नाही तर आपल्या देशातील एका भागातही होतं. आज आम्ही तुम्हाला देशातील एका अशा जागेबाबत सांगणार आहोत जिथे सर्वातआधी सूर्योदय होतो. 

कुठे होतो सर्वातआधी सूर्योदय?

देशात सर्वातआधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशात होतो. या प्रदेशाच्या नावातूनच हे स्पष्ट होतं. अरुणाचल प्रदेशाला उगवत्या सूर्याची भूमी मानलं जातं. या प्रदेशातील लहान ठिकाण डोंग व्हॅलीमध्ये सर्वातआधी सूर्य उगवताना पाहिला जाऊ शकतो. 

रात्री ३ वाजतापासून सुरु होते प्रक्रिया

सूर्याचा प्रकाश आणि किरणांची लाल रंगाची चादर डोंग व्हॅलीमध्ये रात्री ३ वाजतापासून बघायला मिळते. लोहित नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या ठिकाणाला निसर्गाची देण म्हटलं जातं. १९९९ मध्ये या गोष्टीचा शोध लावण्यात आला होता की, भारतात सर्वातआधी सूर्योदय अरुणाचल प्रदेशच्या डोंग व्हॅलीमध्ये होतो. चारही बाजूंनी उंचच उंच डोंगर, हिरवीगार झाडे आणि निळ्या आकाशावर पसरलेल्या सूर्यांच्या रंगात रंगलेले लाल-पिवळे ढग डोळे दिपवणारा नजारा असतो. 

८ किमी ट्रेकिंग करुन जावे लागते

नव्या वर्षानिमित्ताने देशभरातील पर्यटक सूर्याची पहिलं किरणं बघण्यासाठी डोंग व्हॅलीच्या देवांग घाटीत येतात. ही घाटी लोहित जिल्ह्याच्या मॅकमोहन लाइनजवळ आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये तशा तर बघण्यासाठी अनेक जागा आहेत पण लोक सूर्योदय बघण्यासाठी ८ किमी डोंगरांवर ट्रेकिंग करुन येतात. समुद्रसपाटीपासून १२४० मीटर उंचीवर असलेल्या या डोंग व्हॅलीमध्ये लोक एक वेगळीच शांतता आणि एक वेगळाच अनुभव घेऊ शकतात.  

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशtourismपर्यटन