शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला किल्ले रायगड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 13:13 IST

'हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा' असं म्हणतच महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. याच हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवण्यामध्ये सर्व किल्ल्यांपेक्षा वेगळ महत्त्व प्राप्त झालं ते म्हणजे रायगडाला.

'हिंदवी स्वराज्या व्हावे हिच श्रींची इच्छा' असं म्हणतच महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. याच हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवण्यामध्ये सर्व किल्ल्यांपेक्षा वेगळ महत्त्व प्राप्त झालं ते म्हणजे रायगडाला. महाडच्या उत्तरेस 245 किमी अंतरावर वसलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून 2851 फूट उंचीवर आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये वसलेला रायगड चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. रायगडाच्या पूर्वेला लिंगाणा आणि जर निरभ्र आभाळ असेल तर, राजगड, तोरणा दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडापासून मुंबई, पुणे, सातारा ही शहरे सारख्याच अंतरावर आहे. रायगड हा निसर्गतःच डोंगरागांनी वेढलेला असल्यामुळे शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी महाराजांनी पुण्यातील राजगड सोडून पश्चिम डोंगररांगांमध्ये वसलेल्या रायगडाची राजधानी म्हणून निवड केली. 

(Image Credit : Thrillophilia)

रायगडाचा थोडासा इतिहास :

रायगडाचे प्राचीन नाव खरं तर 'रायरी' होतं. पण ब्रिटीश लोक याला 'पूर्वेकडील जिब्राल्टर' असे म्हणत असत. जिब्राल्टरचं ठाणं जितकं अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य. साधारणतः पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्याला रायगडाचं रूप नव्हतं. त्यावेळी तो नुसताच डोंगर होता. तेव्हा त्याला 'रासिवटा' आणि 'तणस' अशी दोन नावं होती. निजामशाहीत रायगडाचा उपयोग फक्त कैदी ठेवण्यासाठी करण्यात येत असे. पुढे महाराजांनी रायगडास वेढा दिला आणि रायगड स्वराज्यामध्ये आला. 

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणं :

पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : 

उतारवयात जिजाऊना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास 'तक्क्याची विहीर' असंही म्हणतात.

नाना दरवाजा : 

या दरवाजास 'नाणे दरवाज' असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. 1674 च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्‍री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस 'देवडा' असं म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

चोरदिंडी : 

महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याचा थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.

हत्ती तलाव : 

महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

राजसभा : 

महाराजांचा राज्याभिषेक जिथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखरीमध्ये नमूद केल्यानुसार, 'तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्‍ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्‍ने जडाव केली.'

नगारखाना : 

सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. याव्यतिरिक्त येथे पाहण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. ज्या क्षणोक्षणी स्वराज्याच्या इतिहासाचे दाखले देत असतात.

गडावर जाण्यासाठी :

- मुंबई-गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बस असतात. तसेच बस स्थानकात बाहेरून जीपही जातात. जिथे पायऱ्या सुरू होतात तेथे उतरून पायऱ्यांनी गडावर जाता येते. जवळ जवळ 1500 पायऱ्या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो.

- नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो. पायऱ्यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे जाऊन उजवीकडे एक पायवाट जाते. त्या वाटेने गेल्यास नानादरवाजाने तुम्ही गड चढू शकता.

टॅग्स :RaigadरायगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजTravel Tipsट्रॅव्हल टिप्सMaharashtraमहाराष्ट्रtourismपर्यटन