शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हे मंदिर आधीच सांगतं 'कधी येणार पाऊस', वैज्ञानिकांनाही सोडवता आलं नाही अजून कोडं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 16:09 IST

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांनी त्यांच्या आत अनेक रहस्य दडवून ठेवले आहेत. असंच एक मंदिर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आहे.

(Image Credit : The Divine India)

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांनी त्यांच्या आत अनेक रहस्य दडवून ठेवले आहेत. असंच एक मंदिर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आहे. असे म्हणतात की, हे मंदिर पावसाची योग्य भविष्यवाणी करतं. तसेच असेही म्हटले जाते की, जर पाऊस येणार असेल तर यां मंदिराचं छत कडक उन्हातही टपकू लागतं आणि पावसाला सुरुवात होताच या मंदिराच्या छतातून पाणी टपकणं बंद होतं. 

हे मंदिर कानपूरच्या भीतरगांव विकासखंडापासून तीन किमी असलेल्या बेहटा गांवात आहे. हे मंदिर भगवान जगन्नाथ यांचं प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात भगवान जगन्नाथ, बलदाऊ आणि सुभद्रा यांच्या मूर्ती आाहेत. प्रांगणात सूर्यदेव आणि पद्मनाभन यांच्या मूर्ती आहेत. जगन्नाथ पुरीप्रमाणे या गावातही भगवान जगन्नाथाची यात्रा काढतात. येथील लोकांची मंदिरावर फार श्रद्धा आहे. लोक दर्शनासाठी दूरुन येतात. 

येथील लोक सांगतात की, पाऊस होण्याच्या सहा-सात दिवसांपूर्वी मंदिराच्या छतातून पाण्याचे थेंब टपकू लागतात. इतकेच नाही तर ते सांगतात की, ज्या आकाराचे थेंब टपकतात त्याच आधारावर पाऊस होतो. यात हैराण करणारी बाब ही आहे की, इथे जशीही पावसाला सुरुवात होते, मंदिराचं छत आतून पूर्णपणे कोरडं होतं. 

हे मंदिर किती जुनं आहे आणि याच्या छतातून पाणी कसं टपकतं किंवा बंद होतं याची माहिती आजपर्यंत मिळू शकलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिराचे पुजारी सांगतात की, पुरातत्त्व विभागाचे लोक आणि वैज्ञानिका अनेकदा इथे येऊन गेलेत, पण या रहस्याची माहिती मिळवण्यात अपयशी ठरले. 

(Image Credit : tripadvisor.in)

पुरातत्व विभागाला केवळ इतकंच माहीत आहे की, या मंदिराचा जीर्णोद्धार ११व्या शतकात करण्यात आलं होतं. या मंदिराची बनावट एखाद्या बौद्ध मठाप्रमाणे आहे. याच्या भींती १४ फूट जाड आहेत. तसेच हे मंदिर सम्राट अशोक यांच्या काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. पण मंदिराच्या बाहेर मोराची निशाणी आणि चक्रही आहे. यांवरून असंही म्हटलं जातं की, हे मंदिर सम्राट हर्षवर्धन कार्यकाळातील असावं. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन