शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

सिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये : अमित काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 5:58 PM

वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी वाहतूकीचे नियम पाळल्यावर दंड भरण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देसिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये : अमित काळेठाणे शहर व परिसरातील वाहतूक या विषयावर मार्गदर्शन वाहतूकीचे नियम नागरिकांनी स्वत:हून पाळले पाहिजे : अमित काळे

ठाणे : वाहतूकीचे नियम नागरिकांनी स्वत:हून पाळले पाहिजे. सिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये. सिग्नल लागल्यावर वाहनचालकांनी स्वत:हून थांबले पाहिजे. मी आधी जाईल यापेक्षा दुस:यांना आधी जायला सांगावे आणि सिग्नल सुटल्यावर ही भावना प्रत्येकात असेल तर वाहतूक कोंडी होणार नाही. तुमचा जीव मूल्यवान आहे, त्याची काळजी तुम्ही स्वत:हूनच घेतली पाहिजे असा सल्ला वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिला.      रोटरी क्लब ऑफ ठाणोच्यावतीने सहयोग मंदिर येथे मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ठाणे शहर व परिसरातील वाहतूक या विषयावर काळे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सुव्यवस्थित वाहतूक होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. भारतात दरवर्षी दीड लाख अपघाती मृत्यू होत आहे आणि ठाण्यात दरवर्षी 200 ते 250 रस्त्यावरचे अपघातात मृत्यू होतात. दुर्लक्षपणो जलद वाहतूक चालविल्याने, वाहतूकीच्या नियमांचे पालन न केल्यास, सिग्नल तोडल्याने अपघाती मृत्यू होतात. चुकीच्या दिशेने वाहतूक चालविण्याचा प्रकार भिवंडी, कल्याणमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. वाहतूकीच्या नियमांचे भंग करणा:या वाहनचालकाला पकडल्यास सुरूवातीला ते वाहतूक पोलीसांचे वाद करतात. मग ओळखीच्यांना फोन करण्याचे प्रकार सुरू होतात. आता आमच्या वाहतूक पोलीसांनी कोणाचेही फोन घेणो बंद केले आहे. आता 1क् पैकी 1क् वाहनचालक सिटबेल्ट लावतात तर 1क् पेकी 9 वाहनचालक हेल्मेट घालत असल्याचे दिसून येत आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त अपघात हे इतर रोडवर जास्त होतात. पादचारी चालताना वाहने पाहत नाही, कानात हेडफोन लावून चालतात. 50 टक्के पेक्षा अधिक अपघात हे दुचाकींचे होतात ते ही केवळ हेल्मेट न घातल्याने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. ज्यावेळी एखाद्या नियमाची अंमलबजावणी करतो तेव्हा ते नियमांचे पालन करणो आवश्यक असते. दोन टक्के वाहनचालक नियम पाळत नाही 98 टक्के वाहन चालक नियम पाळतात असे चित्र दिसण्याऐवजी 98 टक्के वाहनचालक नियम मोडतात आणि केवळ दोन टक्केच वाहनचालक नियम पाळतात. शासनाने दंडाची रक्कम वाझवली तेव्हा त्या रक्कमेची तुलना रस्त्यांवरील खड्डे, आणि वाहतूक कोंडीशी केली जाऊ लागली. प्रत्यक्षात हे दोन्ही विषय वेगळे आहेत. परंतू वाहनचालकांनी नियम पाळले तर दंड भरण्याची आवश्यकताच भासणार नाही. वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबर वाहतूक नियमांची जागृतीही करत आहेत. विद्यार्थीदशेतच मुलांना वाहतूकीचे नियम आणि ते नियम मोडल्यावर होणा:या दुष्परिणामांची जाणीव करुन दिले तर घरातील वाहन चालविणारी मोठी मंडळी हे नियम निश्चितच पाळतील अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाणोचे अध्यक्ष अच्युत दामले आणि सेक्रेटरी श्रीकांत तन्ना उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा