शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

दख्खन पठाराची नाळ जगाशी जोडणारा हजारो वर्षापूर्वीचा सह्याद्रीतला व्यापारी मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 4:14 PM

आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि शांतता मनाला सुखावत होती. ह्या ट्रेकबद्दल अनोखी गोष्ट ती म्हणजे, आज २ जिल्ह्यांमधून मी ट्रेक करणार होतो

परेश शिंदे, प्रसिद्ध यूट्यूबर आणि ट्रेकर

सह्याद्रीच्या डोंगरघाटानं नटलेला भाग म्हणजे आपला महाराष्ट्र, जैवविविधता, खनिज संपत्ती अन् निसर्गाने भरभरून दिलेले दान म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा. नाणेघाट ही डोंगरवाट त्यातीलच एक. असं म्हणतात ना घाटवाट ही डोंगरवाट असते. मात्र प्रत्येक डोंगरवाट ही घाटवाट नसते. जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक हाच तो पश्चिम घाट. हाच माझा सह्याद्री.

इथल्या घाटवाटा जणू सह्याद्रीच्या धमन्याच. घाटवाट फक्त पाहून चालत नाही तर ही गोष्ट आहे पाहण्याची, ऐकण्याची अन् त्याहून जास्त अनुभवण्यासाठी. इतिहासाची पान चाळली तर दख्खन पठाराची नाळ जगाशी जोडणारा भव्य नानेघाट, आज पर्यटकांना भूरळ घालतो. पश्चिम घाटाचा एक भाग असलेला नाणेघाट हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. इतिहासानुसार कल्याण ते जुन्नर या व्यापारी मार्गावर नाणेघाट म्हणजे ऐतिहासिक काळातील टोल वसुली केंद्र. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार करणारा हा एक मार्ग.

नाणेघाटला कसं जायचं?

मुंबईहून नाणेघाटला जायचं असल्यास कल्याण कल्याण मुरबाड मार्गे वैशाखरे गावी यावे. आता वैशाखरे जरी पायथ्याचं गाव असलं तरी त्यापुढे २-३ किमी अंतरावरच नानेघाटचा फलक पाहायला मिळतो. इथून तुमचा ट्रेक सुरु होतो व साधारण २ तासात तुम्ही घाट माथ्यावर पोहोचता. पुण्याहून प्रवास करत असाल तर पुणे-जुन्नर-घाटघर असा प्रवास करा. घाटघरपासून ५ किमी अंतरावरून थेट नाणेघाटात पोहचाल. 

कसा होतो प्रवास?

पहाटे ४ वाजता वैशाखरे या पायथ्याशी असलेल्या गावात आम्ही पोहचलो. मग काय फ्रेश होऊन मस्त मॅगीवर ताव मारला आणि मग आम्ही चालायला सुरुवात केली. सुरुवातीलाच एक कमान लागली. ५ मिनटे अजून चालल्यावर नानेघाटचा प्रवेशद्वार आमच्या स्वागतासाठी सज्ज होता. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि शांतता मनाला सुखावत होती. ह्या ट्रेकबद्दल अनोखी गोष्ट ती म्हणजे, आज २ जिल्ह्यांमधून मी ट्रेक करणार होतो. ५-७ मिनिटातच पाहिली पुढे आम्हाला पाण्यातून चालावे लागले. पायाचे तळवे भिजतील एवढंच काय ते पाणी होतं. हे पार पडल नाही तोच समोर धुक्यात हरवलेला नानचा अंगठा दृष्टी क्षेपात पडला.

गर्द झाडीतून पक्षांचे सुमधुर आवाज कानी येऊ लागले आणि खळे काकांची भैरवी आठवली “वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती”. पुढे ६५ डिग्रीचा छोटासा टेपाड लागतो. इथे मात्र थोडी दमछाक होते पण इतक्यातच समोरच दृश्य आणि हवेतला गारवा यामुळे सगळा क्षीण निघून जातो. या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथा कोरून ठेवलेली आढळते. भारतातील बहुतांशी लिपींची मातृलिपी असणाऱ्या ब्राह्मी लिपीत हा लेख कोरला आहे. डाव्या आणि उजव्या भिंतीवर प्रचंड शिलालेखात देवी नागनीका किने केलेल्या यज्ञांचे, दानाचे एकंदरीत केलेली पुण्यकृत्ये गौरवाने वर्णिली आहेत.

४०-४५ लोक एका वेळेस राहू शकतील एवढी मोठी गुहा याठिकाणी पाहायला मिळते. जीवधन, वानरलिंगी हे डावीकडे तर उजवीकडे वऱ्हाडाचे सुळके, भैरवगड, घनचक्करची रांग व मागे हरिश्चंद्रगड हे सर्व दिसते. इतिहासावर मनापासून प्रेम असेल किंवा त्याकाळच्या गोष्टी जाणून घ्यायची थोडी जरी ओढ मनामध्ये असेल तर हा सातवाहनकालीन व्यापारी महामार्ग डोळ्यासमोर उभा राहतो. विविध वस्तूंच्या दळणवळणाची सोय, पाणी, विश्रांतीसाठीच्या गुहा, करं गोळा करणारा मोठा दगडी रांजण खरच इतिहास प्रेमींसाठी हा ट्रेक मेजवाणीच म्हणावी लागेल.

टॅग्स :Trekkingट्रेकिंग