शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

पावसाळ्यात ताजमहाल पाहण्याची असते वेगळी मज्जा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 3:46 PM

जर संपूर्ण भारत फिरण्याच्या विचारात असाल तर मग सर्वात आधी ताजमहाल फिरण्याचा प्लॅन करा. कारण भारताची शान असलेला ताजमहाल जोपर्यंत तुम्ही फिरत नाही, तोपर्यंत तुमची भारत भ्रमंती पूर्ण होणार नाही.

जर संपूर्ण भारत फिरण्याच्या विचारात असाल तर मग सर्वात आधी ताजमहाल फिरण्याचा प्लॅन करा. कारण भारताची शान असलेला ताजमहाल जोपर्यंत तुम्ही फिरत नाही, तोपर्यंत तुमची भारत भ्रमंती पूर्ण होणार नाही. उत्तर प्रदेशमधील आगरा शहरात असलेल्या या ताजमहालाच्या सौंदर्याच्या संपूर्ण जगभरात चर्चा असतात. प्रेमाची निशाणी असलेला हा ताजमहाल आपल्या अद्भूत सौंदर्याने अनेकांना आपल्या प्रेमात पडायला भाग पाडतो. एवढंच नाहीतर दुबईमध्ये चक्क ताजमहालाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. 

तुम्ही भारतात राहत असाल किंवा परदेशात, पण आयुष्यात एकदातरी ताजमहाल नक्की पाहा. जर तुम्ही ताजमहाल पाहण्याचा विचार करत असाल, तर संपूर्ण प्लॅन करूनच जा. यासाठी कोणत्या वातावरणात? कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी येथे भेट देणं उत्तम राहिल, याचा संपूर्ण प्लॅन करा. 

थंडीमध्ये ताजमहाल पाहायला जाणं टाळा. कारण येथे धुकं असल्यामुळे याचं सौंदर्य तुम्हाला न्याहाळता येणार नाही. याव्यतिरिक्त उन्हाळ्यातही ताजमहाल पाहायला जाणं अत्यंत त्रासदायक ठरू शकतं. आगरामध्ये एप्रिल ते जून दरम्यान तापमान 40 अंश सेल्सिअस असतं. अशातच तुम्हाला हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशन होऊ शकतं. 

मान्सूनमध्ये तुम्ही ताजमहाल फिरण्याचा प्लॅन करू शकता. पावसाळ्यात तुम्हाला ताजमहाल कोणत्याही अडथळ्या व्यतिरिक्त पाहता येईल. तसेच यामुळे तुम्हाला ताजमहालाची खरी चमक अनुभवता येईल. 

पावसाळ्यामध्ये ताजमहाल पाहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, येथे तुम्हाला गर्दी अजिबात भेटणार नाही. मान्सूनमध्ये ट्रिप प्लॅन करणार असाल तर स्वतःसोबत रेनकोट किंवा छत्री ठेवायला विसरू नका. ताजमहालाच्या मागच्या बाजूने यमुना नदी वाहते. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही एका सुंदर दृश्याचे साक्षीदार होऊ शकता. 

लक्षात ठेवा : 

ताजमहाल शुक्रवारी बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे ट्रिप प्लॅन करताना शुक्रवारी न जाता इतर दिवशी प्लॅन करा. 

पौर्णिमेच्या दिवशी ताजमहाल 8:30 ते 12:30 पर्यंत पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात येतो. तसेच पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर आणि नंतरही पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात येतो. इतर दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही येथे भेट देऊ शकता. 

टॅग्स :Taj Mahalताजमहालdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनIndiaभारत