शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राजस्थानमधील 'या' मंदिरातील खांबांबाबतचं रहस्य आजही कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 11:18 IST

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील उपखंड कामां या ठिकाणाबाबत भलेही लोकांना फार जास्त माहीत नसेल.

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील उपखंड कामां या ठिकाणाबाबत भलेही लोकांना फार जास्त माहीत नसेल. पण धार्मिक लोकांमध्ये या ठिकाणाला आध्यात्मिक रूपाने फार महत्वपूर्ण स्थान आहे. कामांचा काही भाग हा ब्रज भूमीला लागून आहे. जिथे भगवान कृष्णाने बालपण घालवलं होतं.

कामां या ठिकाणी तुळशीची झाडे अधिक प्रमाणात बघायला मिळतात. ज्यामुळे या ठिकाणाला आदी वृंदावन असंही म्हटलं जातं. पावसाळ्यात येथील चील महालात यात्राही भरते. याला परिक्रमा यात्रा असंही म्हटलं जातं. 

(Image Credit : findmessages.com)

याच क्षेत्रात राजस्थानचे काही प्रसिद्ध आणि मान्यता असलेली मंदिरे आहेत. यातील एक म्हणजे चौरासी खंबा(84 खांब) मंदिर हे आहे. या मंदिरात ८४ पिलर आहेत, ज्यावरून या मंदिराला हे नाव पडलं आहे. इथे कोणत्याच देवाची मूर्ती नाही. तसेच इथे कोणतीही पूजा केली जात नाही. तरी सुद्धा याला मंदिर म्हटलं जातं. असे मानले जाते की, या मंदिराचं भारतावर राज्य करणाऱ्या अनेक राज्यकर्त्यांनी नुकसान केलं, ज्यामुळे या मंदिराचं मूळ रूप आता राहिलं नाही. 

खांबांचं रहस्य

(Image Credit : Times of India)

या मंदिराबाबतची एक विचित्र बाब पर्यटकांना इथे खेचून आणते. ती म्हणजे, चौरासी खंबा मंदिरात आजपर्यंत कुणीही खांबांची योग्य संख्या मोजू शकले नाहीत. कुणी तसा प्रयत्न केला तर एकतर खांबांची संख्या जास्त दिसतात नाही तर कमी दिसतात. जितक्यांदा तुम्ही हे मोजाल त्या त्या वेळी खांबांची संख्या वेगवेगळी निघते.

युधिष्ठिराची झाली होती परीक्षा

(Image Credit : youtube.com)

स्थानिक लोकांनुसार, या मंदिराजवळ असलेलं धर्मकुंड हे तेच स्थान आहे, जिथे युधिष्ठिरची परीक्षा घेतली गेली होती. महाभारतात या घटनेबाबत वाचायला मिळतं. पण यात किती तथ्य आहे, याचा कोणताही पुरावा मिळत नाही.

टॅग्स :Rajasthanराजस्थानTravel Tipsट्रॅव्हल टिप्स