शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

विमानतळ झाले पण फायदा काय.. सेवा सुरू नसल्याने दुर्लक्ष : दर्शनी भागात गवताचे जंगल, कोट्यधीची गुंतवणूक पण फायदा नाही

By admin | Updated: September 23, 2016 00:47 IST

जळगाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते.

जळगाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते.
जळगावपासून पाच कि.मी. अंतरावरील कुसुंबा गावाजवळ ३०३ हेक्टर जमिनीवर विमानतळाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. या कामाला १९७३ मध्ये प्रारंभ झाला होता. विमानतळाचे हे काम भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले. एकाचवेळी ७२ आसन क्षमता असलेले दोन विमाने उतरू शकतील. अशी रचना या विमानतळाची आहे.
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर विमानसेवा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. विमानतळ झाले, त्याचे लोकार्पणही झाले. मात्र पुरेसे प्रवासी मिळणे शक्य होणार नाही या शक्यतेने विविध विमानसेवा देणार्‍या कंपन्यांकडून विमानतळ विकास प्राधिकरणास नकारच मिळत आला आहे. स्थानिक उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेऊन जेट, किंगफिशर सारख्या कंपन्यांशी तीन वर्षांपूर्वी संपर्क साधला. जेटतर्फे यासाठी सर्वेक्षणही झाले होते. मात्र नंतर या कंपनीनेही नकार घंटा वाजलविली.
विविध सुविधा
विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे कामासाठी ६१ कोटींची निधी मिळाला होता व उर्वरित कामांसाठी ६३ कोटींचा निधी मंजूर होता. प्राप्त निधीतून विमानतळावर विविध कामे पूर्ण झालेली आहेत. यात प्रवासी टर्मिनल पूर्ण झाले आहे. या टर्मिनलची विद्युत उपकरणे ही सौर ऊर्जेवर चालणार आहेत. प्रवासी टर्मिनलमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी दोन कक्ष, प्रवाशांसाठी मोठे प्रतीक्षालय, सुरक्षा तपासणी केंद्र आहे. विमानतळासाठी स्वतंत्र वीज फिडर बसविण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. सध्या असलेली १७०० मीटर लांब व ४५ मीटर रुंदीची धावप˜ी येथे तयार असून सेवा सुरू होऊन प्रतिसाद मिळू लागल्यावर भविष्यात धावप˜ी विस्तारित करण्याचाही प्रस्ताव होता. हे काम झाल्यावर जळगावला बोईंग जातीचे विमानदेेखील उतरू शकेल असे नियोजन होते. विमान उतरल्यानंतर ते ॲप्रनवर येईल. तिथून प्रवाशांना टर्मिनलपर्यंत आणण्यासाठी चारचाकी वाहने ठेवण्यात येतील त्या दृष्टीनेही कामे झालेली असल्याने सुसज्ज असे विमानतळ जळगावात असताना सद्य स्थितीत ते केवळ देखावा ठरत आहे.
-------