शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

विमानतळ झाले पण फायदा काय.. सेवा सुरू नसल्याने दुर्लक्ष : दर्शनी भागात गवताचे जंगल, कोट्यधीची गुंतवणूक पण फायदा नाही

By admin | Updated: September 23, 2016 00:47 IST

जळगाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते.

जळगाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते.
जळगावपासून पाच कि.मी. अंतरावरील कुसुंबा गावाजवळ ३०३ हेक्टर जमिनीवर विमानतळाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. या कामाला १९७३ मध्ये प्रारंभ झाला होता. विमानतळाचे हे काम भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले. एकाचवेळी ७२ आसन क्षमता असलेले दोन विमाने उतरू शकतील. अशी रचना या विमानतळाची आहे.
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर विमानसेवा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. विमानतळ झाले, त्याचे लोकार्पणही झाले. मात्र पुरेसे प्रवासी मिळणे शक्य होणार नाही या शक्यतेने विविध विमानसेवा देणार्‍या कंपन्यांकडून विमानतळ विकास प्राधिकरणास नकारच मिळत आला आहे. स्थानिक उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेऊन जेट, किंगफिशर सारख्या कंपन्यांशी तीन वर्षांपूर्वी संपर्क साधला. जेटतर्फे यासाठी सर्वेक्षणही झाले होते. मात्र नंतर या कंपनीनेही नकार घंटा वाजलविली.
विविध सुविधा
विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे कामासाठी ६१ कोटींची निधी मिळाला होता व उर्वरित कामांसाठी ६३ कोटींचा निधी मंजूर होता. प्राप्त निधीतून विमानतळावर विविध कामे पूर्ण झालेली आहेत. यात प्रवासी टर्मिनल पूर्ण झाले आहे. या टर्मिनलची विद्युत उपकरणे ही सौर ऊर्जेवर चालणार आहेत. प्रवासी टर्मिनलमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी दोन कक्ष, प्रवाशांसाठी मोठे प्रतीक्षालय, सुरक्षा तपासणी केंद्र आहे. विमानतळासाठी स्वतंत्र वीज फिडर बसविण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. सध्या असलेली १७०० मीटर लांब व ४५ मीटर रुंदीची धावप˜ी येथे तयार असून सेवा सुरू होऊन प्रतिसाद मिळू लागल्यावर भविष्यात धावप˜ी विस्तारित करण्याचाही प्रस्ताव होता. हे काम झाल्यावर जळगावला बोईंग जातीचे विमानदेेखील उतरू शकेल असे नियोजन होते. विमान उतरल्यानंतर ते ॲप्रनवर येईल. तिथून प्रवाशांना टर्मिनलपर्यंत आणण्यासाठी चारचाकी वाहने ठेवण्यात येतील त्या दृष्टीनेही कामे झालेली असल्याने सुसज्ज असे विमानतळ जळगावात असताना सद्य स्थितीत ते केवळ देखावा ठरत आहे.
-------