शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भन्नाट अनुभव देणारी केरळमधील नेरियामंगलमची ट्रिप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 13:40 IST

नेरियामंगलम केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक छोटसं गाव. तिरूअनंतरपुरमपासून हे ठिकाण फक्त 204 किमी अंतरावर आहे. पेरियार नदीच्या तटावर ऐटीत वसलेलं हे गाव छोटं असलं तरिही फार सुंदर आहे.

नेरियामंगलम केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक छोटसं गाव. तिरूअनंतरपुरमपासून हे ठिकाण फक्त 204 किमी अंतरावर आहे. पेरियार नदीच्या तटावर ऐटीत वसलेलं हे गाव छोटं असलं तरिही फार सुंदर आहे. येथे केळी, अननस, नारळ, कॉफीची शेती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. येथील निसर्गसौंदर्य आणि मनमोहक वातावरण मन प्रसन्न करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. पहाटेच्या वेळी सुर्याची कोवळी किरणं ज्यावेळी ढगांच्या आडोशातून हलकेच डोकावतात हिरवी शाल पांघरलेल्या डोंगरांवर पडतात त्यावेळी ते दृश्य डोळ्यांमध्ये साठवून ठेवावसं वाटतं. तसं पाहायला गेलं तर देवाची भूमी म्हणून ओळखलं जाणारं केरळ पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. परंतु केरळमध्येच असलेल्या नेरियामंगलमबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. या गावाला 'इडुकी गेटवे' असंही म्हटलं जातं. 

या गावात गेल्यानंतर तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूंना झाडं आणि त्यांच्या मध्ये पारंपारिक पद्धतीने बांधलेली छोटी-छोटी घरं पाहायला मिळतील. येथील वस्त्यांमध्ये राहणारी लोकही पारंपारिक वेशभूषांमध्ये दिसून येतात. नेरियामंगलममध्ये पाऊस जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे या गावाला केरळातील चेरापुंजी असंही म्हटलं जातं. 

नेरियामंगलम ब्रीजबाबत सांगायचे झालेचं तर हा ब्रीज मुन्नारला भारताच्या इतर शहरांशी जोडतो. हा ब्रीज पेरियार नदीवर बांधण्यात आला आहे. येथील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी आणखी एक ठिकाण म्हणजे अवरकुट्टी होय. हे ठिकाण जंगलाच्या मध्यावर नेचर लव्हर्स आणि ट्रेकर्ससाठी तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे एकदा तरी येथील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी येथे भेट देणं गरजेचं ठरतं. 

डोंगरांवर जंगल्याच्या रस्त्यावरून जात असताना तुम्ही ट्रेकिंग करत करत तुम्ही मनुकुलम जे मुन्नारजवळ पोहोचाल. हा रस्ता जवळपास 20 किलोमीटर लांब असून येथे तुम्ही कधीही गेलात तर हमखास गजराजाचं दर्शन घडणारचं. Inchathotty Suspension Bridge नेरियामंगलम येथील सर्वात सुंदर अट्रॅक्शन आहे. हा ब्रीज प्रसिद्ध गोल्डन गेट ब्रीजचं छोटं रूप समजलं जातं. 

येथे भेट देण्यासाठी उत्तम काळ

नेरियामंगलम हे त्या खास ठिकाणांपैकी एक आहे. जिथे वर्षातून कधीही भेट देऊ शकता. परंतु तरिही येथे पाऊस जास्त पडतो. अनेकदा पावसाळ्यामध्ये येथील रस्ते ब्लॉक होतात. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यामध्ये येथे जाणं टाळा. थंडीमध्ये फिरण्यासाठी हे उत्तम डेस्टिनेशन ठरेल. कारण यावेळी पेरियार नदीच्या बांधावरील फाटकं बंद केली जातात. त्यामुळे संपूर्ण जंगलामध्ये पाणी भरतं. अशावेळी तुम्ही बोटीमध्ये फिरून संपूर्ण जंगलात फिरू शकता. 

कसे पोहोचाल नेरियामंगलमला?

येथून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे आलुवा. जे 45 किलोमीटर लांब आहे. या स्टेशनवरून देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाण्यासाठी ट्रेन्स मिळतील. कोच्ची विमानतळावरून  51 किमी. अंतरावर तुम्ही व्यवस्थित पोहोचू शकता. येथे थांबण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बजेटमध्ये हॉटेल्स आणि लॉजही उपलब्ध आहेत.  

टॅग्स :tourismपर्यटनKeralaकेरळ