शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

भन्नाट अनुभव देणारी केरळमधील नेरियामंगलमची ट्रिप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 13:40 IST

नेरियामंगलम केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक छोटसं गाव. तिरूअनंतरपुरमपासून हे ठिकाण फक्त 204 किमी अंतरावर आहे. पेरियार नदीच्या तटावर ऐटीत वसलेलं हे गाव छोटं असलं तरिही फार सुंदर आहे.

नेरियामंगलम केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक छोटसं गाव. तिरूअनंतरपुरमपासून हे ठिकाण फक्त 204 किमी अंतरावर आहे. पेरियार नदीच्या तटावर ऐटीत वसलेलं हे गाव छोटं असलं तरिही फार सुंदर आहे. येथे केळी, अननस, नारळ, कॉफीची शेती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. येथील निसर्गसौंदर्य आणि मनमोहक वातावरण मन प्रसन्न करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. पहाटेच्या वेळी सुर्याची कोवळी किरणं ज्यावेळी ढगांच्या आडोशातून हलकेच डोकावतात हिरवी शाल पांघरलेल्या डोंगरांवर पडतात त्यावेळी ते दृश्य डोळ्यांमध्ये साठवून ठेवावसं वाटतं. तसं पाहायला गेलं तर देवाची भूमी म्हणून ओळखलं जाणारं केरळ पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. परंतु केरळमध्येच असलेल्या नेरियामंगलमबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. या गावाला 'इडुकी गेटवे' असंही म्हटलं जातं. 

या गावात गेल्यानंतर तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूंना झाडं आणि त्यांच्या मध्ये पारंपारिक पद्धतीने बांधलेली छोटी-छोटी घरं पाहायला मिळतील. येथील वस्त्यांमध्ये राहणारी लोकही पारंपारिक वेशभूषांमध्ये दिसून येतात. नेरियामंगलममध्ये पाऊस जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे या गावाला केरळातील चेरापुंजी असंही म्हटलं जातं. 

नेरियामंगलम ब्रीजबाबत सांगायचे झालेचं तर हा ब्रीज मुन्नारला भारताच्या इतर शहरांशी जोडतो. हा ब्रीज पेरियार नदीवर बांधण्यात आला आहे. येथील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी आणखी एक ठिकाण म्हणजे अवरकुट्टी होय. हे ठिकाण जंगलाच्या मध्यावर नेचर लव्हर्स आणि ट्रेकर्ससाठी तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे एकदा तरी येथील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी येथे भेट देणं गरजेचं ठरतं. 

डोंगरांवर जंगल्याच्या रस्त्यावरून जात असताना तुम्ही ट्रेकिंग करत करत तुम्ही मनुकुलम जे मुन्नारजवळ पोहोचाल. हा रस्ता जवळपास 20 किलोमीटर लांब असून येथे तुम्ही कधीही गेलात तर हमखास गजराजाचं दर्शन घडणारचं. Inchathotty Suspension Bridge नेरियामंगलम येथील सर्वात सुंदर अट्रॅक्शन आहे. हा ब्रीज प्रसिद्ध गोल्डन गेट ब्रीजचं छोटं रूप समजलं जातं. 

येथे भेट देण्यासाठी उत्तम काळ

नेरियामंगलम हे त्या खास ठिकाणांपैकी एक आहे. जिथे वर्षातून कधीही भेट देऊ शकता. परंतु तरिही येथे पाऊस जास्त पडतो. अनेकदा पावसाळ्यामध्ये येथील रस्ते ब्लॉक होतात. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यामध्ये येथे जाणं टाळा. थंडीमध्ये फिरण्यासाठी हे उत्तम डेस्टिनेशन ठरेल. कारण यावेळी पेरियार नदीच्या बांधावरील फाटकं बंद केली जातात. त्यामुळे संपूर्ण जंगलामध्ये पाणी भरतं. अशावेळी तुम्ही बोटीमध्ये फिरून संपूर्ण जंगलात फिरू शकता. 

कसे पोहोचाल नेरियामंगलमला?

येथून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे आलुवा. जे 45 किलोमीटर लांब आहे. या स्टेशनवरून देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाण्यासाठी ट्रेन्स मिळतील. कोच्ची विमानतळावरून  51 किमी. अंतरावर तुम्ही व्यवस्थित पोहोचू शकता. येथे थांबण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बजेटमध्ये हॉटेल्स आणि लॉजही उपलब्ध आहेत.  

टॅग्स :tourismपर्यटनKeralaकेरळ