शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

कार किंवा बाइक नाही तर सायकलने घ्या 'या' ठिकाणांवर फिरण्याचा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 15:08 IST

फिरायला जाण्याचा अर्थ केवळ डेस्टिनेशन कव्हर करणे हा होत नाही. तर त्या ठिकाणावरील खाद्य पदार्थ, कल्चर आणि वेगवेगळ्या गोष्टी बघणं, जाणून घेणं हे महत्त्वाचं असतं.

फिरायला जाण्याचा अर्थ केवळ डेस्टिनेशन कव्हर करणे हा होत नाही. तर त्या ठिकाणावरील खाद्य पदार्थ, कल्चर आणि वेगवेगळ्या गोष्टी बघणं, जाणून घेणं हे महत्त्वाचं असतं. ग्रुप किंवा सोलो ट्रिपचा आपलाच एक वेगळा आनंद असतो. त्यात हा प्रवास जर सायकलने केला तर आणखी वेगळी मजा. 

सायकलिंग करत तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना वेगवेगळ्या गोष्टी निवांत बघू शकता. सायकलिंग करत फिरायला जाणं सोपं नक्कीच नाही, पण याची एक वेगळीच मजा आहे. अॅडव्हेंचर म्हणूण अनेकजण हे करतात. तुम्हालाही असंच काही करायचं असेल आम्ही तुमच्यासाठी सायकलिंगसाठी बेस्ट ठिकाणं घेऊन आलो आहोत. 

बंगळुरू ते नंदी हिल्स

(Image Credit : TripAdvisor)

जर तुम्हाला शहराच्या आजूबाजूला जाऊन वीकेंड एन्जॉय करायचा असेल आणि तुम्ही बंगळुरूला गेलात तर नंदी हिल्सला जाऊ शकता. या ठिकाणी टीपू सुल्तान उन्हाळ्यात वेळ घालवण्यासाठी यायचा. बंगळुरू ते नंदी हिल्स हा रस्ता फारच सुंदर आहे. या रस्त्यात साधारण ४० टर्न आहेत. जे पावसाळ्यात थोडे धोकादायक ठरू शकतात. सायकलिंग करत इथे पोहोचणं टफ आहे, पण वेगळ्या अनुभवासाठी असंच करावं लागतं. 

मुंबई ते अलिबाग

(Image Credit : Mumbai Travellers)

मुंबईमध्ये राहणाऱ्यांसाठी वीकेंड डेस्टिनेशन म्हणूण अलिबाग चांगलं ठिकाण आहे. सायकलिंगसाठी हा रस्ताही परफेक्ट आहे. पावसाळ्यानंतर तर इथे कॅम्पिंग करणाऱ्यांची संख्याही अधिक बघायला मिळते. त्यानुसार येथील ट्रिप प्लॅन करा. सायकलिंग करत गेल्यावर अथांग समुद्र तुम्हाला बाहूपाशात घेण्यासाठी सज्ज असेल. 

कलिमपोंग ते जुलूक

(Image Credit : East Himalaya)

समुद्र सपाटीपासून ३०७८ मीटर उंचीवर स्थित जुलूक हे छोटं गाव आहे. पण अॅडव्हेचंर एक्सप्लोर करण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. सायकल रायडिंगसाठी येथील रस्त थोडे रिस्की आहेत, कारण इथे फारच वळणदार रस्ते आहेत. त्यामुळे इथे सायकलिंग करताना थोडी अधिक काळजी घ्यावी लागते. 

बोमडिला ते तवांग

(Image Credit : indianexpress.com)

हा प्रवासही थोडा खडतर आहे पण अशक्य नाही. तुम्हाला तुमच्या स्टॅमिनावर फोकस करावा लागेल. हिरवीगार जंगलं, तांदळाची शेतं आणि चढउतार असलेले सुंदर रस्ते एक रोमांचक अनुभव देऊ जातात. तुम्हाला इथे जायचं असेल तर उन्हाळा हा परफेक्ट कालावधी आहे. कारण पावसाळ्यात व हिवाळ्यात इथे प्रवास करणे फार अडचणीचे असेल.

सोमनाथ ते दीव

(Image Credit : Heritage India Holidays)

सोमनाथ ते दीव जाण्याचा रस्ताही फार सुंदर आणि शानदार आहे. नारळाची झाडे आणि समुद्राचा नजारा तुमचा प्रवास अविस्मरणीय करेल. तसेच रस्त्यात अनेक बघण्यासारखी ठिकाणे सुद्धा आहेत. त्यातील एक म्हणजे गिर नॅशनल पार्क एक आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन