टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
राज्यातील टोमॅटो आवक आज काही अंशी कमी होती. आज केवळ नऊ बाजारसमितींमध्ये टोमॅटो आवक बघावयास मिळाली. ज्यात लोकल वाणाच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक होती तर वैशाली टोमॅटोची केवळ एका ठिकाणी भुसावळ येथे आवक होती. ...
राज्यात आज लोकल वाणांच्या टोमॅटोची सर्वाधिक पुणे येथे २५४९ क्विंटल आवक झाली होती. तर हायब्रिडची सर्वाधिक आवक मुरबाड येथे ३८ क्विंटल होती. यासोबतच नं.१ टोमॅटोची मुंबई येथे २६६६, वैशाली टोमॅटोची सोलापूर येथे २६९ क्विंटल आवक होती. ...
भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अखेर कामास आल्या असून, कांद्यांसह बटाटे व टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. ...
आवक वाढल्यामुळे सर्वत्र २९ जुलैपासून टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली. ते आता बरेच खाली आले आहेत. सरकार मुंबई आणि दिल्लीत ६० रुपये किलो या दराने टोमॅटो विकत आहे. कांद्याच्या भावात दहा रुपयांची घसरण झाली आहे. ...