मानवी विकासाचे सर्वांगीण प्रतिमान तयार करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज, शुक्रवारी (दि. ६ मे) शंभरावा स्मृतिदिन ! केवळ अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेले शाहू महाराज यांनी करवीर संस्थानचे राजे म्हणून अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार सांभाळला. ...
स्त्रियांना पुरुषप्रधानतेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी शाहू महाराजांनी क्रांती घडवणारे पाच कायदे केले. विधवा पुनर्विवाह कायदा १९१७, आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह कायदा घरगुती छळ प्रतिबंधक कायदा१९१९, काडीमोड कायदा असे कायदे केले. ...
'वंदन लोकराजाला, शंभर सेकंद कृतज्ञतेचे' हा व्हिडिओ सोमवारी (दि. २) सायंकाळी प्रसारित झाला आणि अल्पावधीतच नेते, अभिनेत्यांपासून सामान्य कोल्हापूरकरांच्या हातातील मोबाईलवर या व्हिडिओची म्युझिक थीम फिरू लागली. ...
राज्याच्या नोकरशाहीवर मूठभर लोकांची मक्तेदारी होती. शिक्षणाची फार मोठ्या प्रमाणावर सोय नव्हती, त्यामुळे सत्ता हाती आल्यानंतर मूलभूत सुधारणा करण्याचा व प्रशासनाची पुनर्रचना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यात आधुनिक तत्त्वांचा वापर केला. ...
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा मूलमंत्र जपणाऱ्या शाहू महाराजांनी लेखक, कवी, शाहीर, संशोधक आणि पत्रकार या सर्वच साहत्यिक मंडळींवर उदंड प्रेम केले. त्यांना भरभरून आर्थिक साहाय्य केले. त्यांच्या अडीअडचणीच्या काळात हा राजा त्यांच्या पाठीशी पहाडासारखा उभा ...
संस्थान इंग्रजांच्या अंकीत असतानाही त्यांनी धर्मसुधारणेच्या प्रयत्नांना जे बळ दिले, त्यातून सत्यशोधक धर्माचा विचार कोल्हापुरात अधिक बळकट झाला. आजही याच विचारांमुळे कोल्हापूर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पुरोगामी म्हणून ओळखले जाते. ...