चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
List A Cricket New Records: विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने 220 धावांची नाबाद खेळी केली. ...
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने १२ वर्षांनंतर आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आणि या विजयाचा ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) हाही वाटेकरी आहे. ...