सुमारे ३३ वर्षे जुना असलेला आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल वाहतुकीसाठी अरुंद पडत असल्याने त्यांच्या रुंदीकरणाची मागणी होती. याच मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये सदर पुलाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाची घोषणा केली. ...
हरणघाट-चामोर्शी या १४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर जागोजागी मोठंमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष झाले असून खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ...
पावसाळ्यात खड्ड्यात पाणी, पाण्यात वाहन चालवून प्रवास करणारे शिव्या देत वाहन पुढे नेत घर जवळ करतात; राज्यमार्गाने जाणाऱ्या अनेकांनी हे अनुभवले आहे. पण, मंत्र्यांचा दौरा असला की तत्काळ खड्डे बुजवले जातात. ...