भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
विश्वचषकात पाकिस्तानला आधी 'अंडरडॉग' मानले जात होते, पण आता परिस्थिती बदलू लागली असून भारतीय संघही पाकिस्तानी संघाचा आदर करत असल्याचे रमीझ राजा म्हणाले होते. ...