जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेनेला मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सिंडीकेट बँकेत आर्मी वेलफेअर फंड नावाने हे खाते असून, अभिनेते अक्षयकुमार यांच्या सूचनांवर पंतप्रधानांनी ह ...
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये दोन जवान महाराष्ट्रातील असून दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा सध्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी बंदची ह ...
पुलवामा (काश्मिर) येथे शहीद झालेल्या वीर जवानांना शनिवारी वणीत फेरी काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळ व लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या या फेरीत १० हजार विद्यार्थ्यांसह नागरिकही सहभागी झाले होते. ...