जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
यावेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’पेक्षाही मोठ्या, व्यापक आणि परिणामकारक कारवाईची जनतेला अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्यास भाजपाला त्याची किंमत आगामी लोकसभा निवडणुकीत चुकवावी लागू शकते. त्यामुळे मोदी सरकारची चांगलीच गोची झाली आहे. ...
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज (18 फेब्रुवारी) देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये अनेक राज्ये सहभागी झाल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने दिली आहे. ...
कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये केंद्राच्या काश्मीरबाबतच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे, असाही सवाल उपस्थित केला आहे. ...
होय, सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘भारत’ ईदच्या मुहूर्तावर पाकिस्तानात प्रदर्शित होणार होता. पण आता सलमानच्या या चित्रपटाला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित न करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. ...