जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. बॉलिवूडच्या अनेकांनी या भ्याड हल्ल्याची निंदा करत, हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. आता यापुढे जात, इंडस्ट्रीने पाकिस्तानी कलाकारांवर पूर्ण ...
राज्यातील धुळे जिल्ह्यात तेलंगणाचे एकमेव भाजपा आमदार राजासिंह यांनी सभेला संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वच मावळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, ...
कोल्हापूर शहरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, गुजरी, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, आदी परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन, सोमवारी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे गुजरी परिसरात सकाळी निषेध फेरी ...