ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ क्रिकेट क्लब ऑफ इंडिया ( सीसीआय), पंजाब क्रिकेट असोसिएशन आणि पंजाब क्रिकेट असोसिएशन यांनी आपापल्या गॅलरीतून पाकिस्तान क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकले. ...
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनेही आपला संताप बोलून दाखवला. कंगनाचे हे वक्तव्य पाकिस्तानींच्या जिव्हारी लागले. पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्ट हिचा तर इतका जळफळाट झाला की, तिने थेट ...