जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शहरात विविध संघटनांतर्फे कॅन्डल मार्च आणि दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली देण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी नागपूर शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांनी सीआर ...
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ क्रिकेट क्लब ऑफ इंडिया ( सीसीआय), पंजाब क्रिकेट असोसिएशन आणि पंजाब क्रिकेट असोसिएशन यांनी आपापल्या गॅलरीतून पाकिस्तान क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकले. ...