जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
उत्तर प्रदेशमधील एक पोलीस कॉन्स्टेबल तीन दिवसांची सुट्टी घेऊन शहीदांच्या कुटुंबीयांसाठी निधी गोळा करत आहेत. फिरोज खान असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. ...
भारताचा यशस्वी फिरकीपटू हरभजन सिंग आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव संजय पटेल यांच्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही पाकिस्तानविरुद्ध सर्व संबंध तोडण्याची मागणी केली आहे. ...
२,५०० जवानांना घेऊन ७८ लष्करी वाहनांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला १४ फेब्रुवारी रोजी चाललेला असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. ...