जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
ते आमचे 40 मारतात, तर आम्ही त्यांचे 400 मारले पाहिजेत. तरच पाकिस्तान आपल्यासोबत बरोबरीची भाषा करेल. नाहीतर आपल्याला कमजोर समजेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या अशी याचना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. 'आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू' असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. ...
क्रीडा क्षेत्रात पाकिस्तानशी असलेले संबंध सुरळीत ठेवूनही भारताच्या पदरात काय पडले, हा इतिहास जगासमोर आहे. त्यामुळे खेळ महत्त्वाचा की देशाभिमान हे ठरवण्याची वेळ आली आहे. त्याबाबत देशवासीयांच्या भावना तीव्र आहेत. ...
पुलवामा हल्ल्यानंतर जम्मूमध्ये संतप्त जमावाने अनेक वाहने जाळली व काश्मीर खोऱ्यातील लोकांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे जम्मूमध्ये अनेक दिवस संचारबंदी पुकारावी लागली. ...
स्थानिक बस स्थानक येथून रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास निघालेला आॅटो चालक व मालकांचा मोर्चा इंगोले चौक, ठाकरे मार्केट चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, इंदिरा गांधी पुतळा चौक होत दुपारी १ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ...