जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
बालकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. ...
युद्धामध्ये किती जणांचा मृत्यू झाला याबाबत मोजणी कोणताच देश किंवा संघटना करत नाही. युद्धात अनेक लोकांचा मृत्यू होतो. कोणत्याही युद्धात मृत्यूमुखी पडलेल्यांचा निश्चित आकडा सांगता आले नाही. ...
पुलवामात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० जवानांचा १४ फेब्रुवारी रोजी आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर जवानांच्या कुटुंबियांसाठी मुर्तझा ए. हामीद (४४) यांनी त्यांच्या करपात्र उत्पन्नातून ११० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ...