जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
भाजपा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला. ...
जोश, उत्साह, नवचैतन्य असे तरुणाईबद्दल म्हटले जाते. दुसरीकडे याच तरुणाईला भरकटलेली तरुणाई म्हणून सन्मानाची वागणूकही मिळत नाही. परंतु अशा बिरुदापासून स्वत:ला दूर ठेवून काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द तरुणाईमध्येच असते. असाच एक आगळावेगळा उपक्रम उपराजधा ...
देशाचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमकं करतो काय, तो कसला सल्ला देतो, असा प्रश्नही विचारत राज यांनी पुलवामा हल्ल्याची जबाबदारी अजित डोवाल यांची नव्हती का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ...