जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मोदी सरकारला पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे हल्ले पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊन उध्वस्त करण्याचा सल्ला आपणच दिला होता असे वक्तव्य केले होते... ...
काश्मीर सीमेलगत पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील केरी, बटल यापरिसरात रविवारपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे ...
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पुढाकार घेतला आहे. ...
मसूद अजहरच्या प्रस्तावाला आमचा पूर्णपणे विरोध नाही, आमची इच्छा आहे की या प्रस्तावावर खुली चर्चा करण्यात यावी. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी करण्याच्या प्रस्तावावर काही दिवसांतच निर्णय होईल असा विश्वास चीनने भारताला दिला. ...
भारतीय हवाई दलाने गुरुवारी रात्री पंजाब राज्यातील पाकिस्तान सीमेजवळ युद्धसराव करुन पाकिस्तानी सैन्याची झोप उडवली. या अभ्यासात मोठ्या प्रमाणात भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानाने भाग घेतला. ...