जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
भारतासाठी अत्यंत घातक ठरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर मेला असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले आहे. ...
पुलवामातील दहशतवादी हल्ला, त्यानंतरचा हवाई हल्ला आणि भारत-पाकिस्तान तणाव याबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे. मात्र, जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे होणार हाल, याबाबत फारसे बोलले जात नाही. यातील गांभीर्य लक्षात घेऊन शहीद झालेल्या कुटुंबियांच् ...