जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले. ...
पाकिस्तानमधील या अनोख्या चहा स्टॉलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांकडून ट्विटरवर हा फोटो व्हायरल करण्यात आहे. ...
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं ...
अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आश्वासन दिलंय की, ते दहशतवाद संपवण्यासाठी आणि भारतासोबत वाढलेला तणाव कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करत आहे. याबाबतची माहिती अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधील अधिका-यांनी दिली. ...
रांची येथे झालेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाने आर्मी कॅप घालून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांना श्रंद्धांजली वाहिली. ...