शासकीय वसतिगृहातील मुलींनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिका-यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून वसतिगृहास भेट देण्याचे आश्वासन दिले. ...
शेतक-यांना कृषीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सकाळी महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास चालेल्या या आंदोलनाने विभागाच्या अधिका-यांची चांगलीच गोची झाली. ...
पूर्णा तालुक्यातील झिरोफाट्यापासून पुर्णेकडे जाणा-या रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या १०.६० किमी डांबरी रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, एक वर्षानंतरही या कामाला म्हणावी तशी गती मिळली नाही. ...
उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. ...
शहरातील जुना पेडगावरोड परिसरातील वैभवनगर भागात गुरुवारी मध्यरात्री चोरट्यानी घराच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करीत कपाटातील १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ...
मानवत तालुक्यातील ४९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचा तालुका प्रशासनाच्या वतीने विविध मुद्यांवर सर्वे केला असून या माहितीचे संकलन पूर्ण झाले आहे. ...
हमाल - माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी संपावर गेलेल्या हमालांनी आज सकाळी मोंढा बाजारपेठेतून मोर्चा काढून संपाची तीव्रता आणखी वाढविली. ...