राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. तीन वेळा आमदार राहिलेले दिलीप सानंदा यांनी 'हाता'ची साथ सोडली असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर, नागालँड मधील नेत्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील गुटाचे समर्थन केले होते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत NDPP आणि सहकारी भाजपनंतर, NCP राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. ...