राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे असं अजित पवार यांनी म्हटलं. ...
लातूरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
Suraj Chavan NCP Chhaava clash news: विवेकानंद पोलिस ठाण्याचे एक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) एक पथक अशा दोन स्वतंत्र टीम सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना. ...
पत्रकारांसोबत चर्चा सुरू होती तेव्हा अचानक ५०-६० जण आले आणि त्यांनी आमच्या नेत्याला तू बोलतो, पत्ते उधळतो असं सांगत मारहाण करण्यास सुरुवात केली असं त्यांनी सांगितले. ...
अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं. ...
पोलिस ठाण्यात अनभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्याने पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच ‘आवाज खाली..शहाणपणा करू नका..’ असे म्हणत पोलिसांनाच धारेवर धरले होते. ...