राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महायुतीतील नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: अजित पवारांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले. पण ब्लॅकबॉक्सचे संभाषण अद्याप जाहीर झाले नाही. हा विलंब अनाकलनीय असून, संशय बळावत चालला आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबद्दल अद्यापही स्पष्टता आलेली नाही. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही, असे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज स्पष्ट केले. ...