राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
या बैठकीला उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोराट, तर शरदपवार गटाकडून जयंत पाटिल आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. ...
राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक लागेल या शक्यतेने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून, मुंबईतील ३६ पैकी ६ जागांवरून तिढा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...