राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Politics : काल महाविकास आघाडीतील नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर भेट दिली. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. ...
राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवार आणि अजित पवार गटात संघर्ष पाहायला मिळतो. त्यात शरद पवार गटाच्या सोशल मीडियातून अजित पवारांवर सातत्याने निशाणा साधला जात असल्याचं दिसून येते. ...
हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याचे काही स्पष्ट संकेतही मागील काही दिवसांत मिळाले असून तीन घटनांमुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे. ...