राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप भाजप करत आला आहे. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे... ...
Ajit pawar on Nawab Malik: नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मनी लाँड्रिंग, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाचा विरोध होता. ...