राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Lokmat Maharashtrian of the year Awards 2025 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये सभागृहात होणारी जुगलबंदी आपण अनेकदा पाहिली आहेच. विरोधकांच्या अडचणीत आणणाऱ्या अनेक प्रश्नांना देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वाक ...