राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Harshvardhan Sapkal: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही, ...
Sanjay Raut News: गेली दहा वर्षे शरद पवार विरोधी पक्षात आहेत. मंत्रिपद किंवा दुकाने वाचवण्यासाठी आम्हाला सत्ता नको, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करावं किंवा स्वतंत्र राहावे की अगदी दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण करून तिसरा पक्ष काढावा, हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे ...