राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Devendra Fadnavis on Jayant Patil: जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सातत्याने होत आहेत. त्यांचे निकटवर्तीये असलेल्या अण्णासाहेब डांगे यांनी भाजपत प्रवेश केल्याने पुन्हा या चर्चांना फोडणी मिळाली आहे. ...
माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर्त अभय दिले आहे. यापुढे वागण्या-बोलण्याबाबत एकही चूक केली तरी घरी जावे लागेल, असा सज्जड दमही दिला. दहा मिनिटे क्लास घेतला. ...
या बैठकीआधी नाशिकच्या काही शेतकरी संघटनांनी कोकाटे यांच्या समर्थनार्थ अजितदादांची भेट घेतली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली ...