राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP SP Group MP Supriya Sule News: बाळासाहेब ठाकरे यांचे देशासाठी आणि राज्यासाठी योगदान राहिलेले आहे. कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
NCP Deputy CM Ajit Pawar News: बीड जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होऊन दरवर्षी सुमारे ७ हजार युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ...