NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. Read More
Nitish Kumar Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नितीश कुमार यांनी आपल्याच पक्षातील तब्बल १६ नेत्यांची हकालपट्टी केली. १६ नेत्यांमध्ये आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. ...
महाआघाडीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह दिसून येत आहे. रिस्थिती इतकी बिकट आहे की, एकेकाळी एनडीएविरुद्ध एकत्रित लढण्याच्या गप्पा करणारे पक्ष आता परस्परांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. ...
बिहारमधील लोकांना एनडीएच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा एनडीएला विजयी करावे, असे आवाहन अमित शाह यांनी केले. ...
पंतप्रधानांच्या सभा जाहीर झाल्या असताना महाआघडीचे ‘स्टार फेस’ काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र अजूनही प्रचारातून गायब आहेत. दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतरही त्यांचे लक्ष बिहारकडे वळलेले दिसून येत नाही. ...
CM Devendra Fadnavis Bihar Rally News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार येथील काही ठिकाणी भाजपाच्या प्रचारसभा, रोड शो यात सहभागी होत एनडीएचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ...