नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थिनीसह दोघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे अनुक्रमे सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल झाले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ...
केंद्र व राज्य शासन सातत्याने कामगारविरोधी धोरणे राबवित असून यामुळे देशातील औद्योगिक क्षेत्राचा माहोल ढासळत चालला आहे. या धोरणांमुळे कामगारांची स्थिती वाईट झाली असून भविष्यात ‘बंधुआ’ कामगार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटित, असंघटित क ...
हवाईमार्गाने विदेशातून बेकायदेशीररीत्या विविध वस्तू घेऊन येणाऱ्यांवर केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर विभागाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’चे बारीक लक्ष असते. गेल्या तीन वर्षांत नागपुरात अनधिकृतपणे माल घेऊन येणाऱ्या ४१ जणांवर कारवाई करण्यात आली व त्यां ...
ग्रामीण भागातील हुशार गरीब विद्यार्थी हे शिकवणी नसल्याने किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी मागे पडतात, ही वस्तुस्थिती आहे, अशा विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन नि:शुल्क उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आता जनमंचने पुढाकार घेत ग्रामीण विद्यार्थ्या ...
डॉ.मेश्राम यांच्या सेवापुस्तिकेनुसार त्यांना सरकारतर्फे अतिरिक्त वेतन अदा करण्यात आले असून याबाबत विद्यापीठाने अभिप्राय कळावावा, असे यात नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे डॉ.मेश्राम यांनी शासनाकडूनच आपल्याला वेतनाची थकबाकी मिळणे बाकी ...
विविध राज्यात चोरी-घरफोडी करून प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात शेट्टी टोळीतील तीन गुन्हेगारांना अटक करण्यात अजनी पोलिसांनी यश मिळवले. त्यांच्याकडून रोख आणि दागिन्यांसह पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. आठ जणांच्या या टोळीतील पाच जण फरार असू ...
लग्न समारंभात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर व-हाड्यांनी कॅटरर्सकडे काम करणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सोनू ऊर्फ स्वप्निल रमेश डोंगरे (वय ३०) या तरुणाचा करुण अंत झाला. ...
लग्नात जेवण केल्यानंतर काही वेळाने पाहुणे मंडळींपैकी ३८ जणांना हगवण व ओकारीचा त्रास जाणवायला लागला. त्यात नववधू व वराचाही समावेश आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सुटीही देण्यात आली. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती ...