विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन तीन दिवस झाले असले, तरी भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार अद्यापही सभागृहात आलेले नाही, शिवाय नागपुरात आलेल्यांपैकी अनेक सदस्य कामकाजात सहभागी होत नसल्याचे चित्र आहे. ...
राज्यातील तब्बल १२३ शाळांतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळावा, या मागणीसाठी शिक्षकांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलनही सुरू केले. परंतु त्याची दखल न घेतल्याने बुधवारी (दि. १३) आंदोलक शिक्षकांनी धरणे मंडपात भीक मागितली. ...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आॅक्टोंबर २0१७ अखेर अनुक्रमे ८४६२ आणि १५७७५ असे एकूण २४२३७ कृषिपंप जोडण्या पैसे भरुनही प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला. ...
कर्जमाफी आणि बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा स्थगन प्रस्ताव विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडला मात्र या स्थगन प्रस्तावावर सरकार चर्चा करायला तयार नसल्याने सभागृहामध्ये गदारोळ झाला. ...
- आनंद डेकाटेनागपूर : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळात आक्रमक धोरण अवलंबिले. यामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तर परिषदेचे कामकाज दोनवेळा स्थगित करण्यात आले. परंतु त्यानंतर ...
राज्यातील ब्रिटिशकालीन व सुरक्षा मुदत संपलेल्या ४४४ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले आहे. या पुलांमध्ये संरचनात्मक दोष आढळून आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...
मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकावर सप्टेंबरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच स्थानकांबाहेरील अवैध स्टॉल्स आणि दुकाने हटविण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. ...