Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचारांसंदर्भात 6500 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यांपैकी 11 घटना अति संवेदनशील आहेत. यांच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. ...